शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

भुलथाप मिळाल्याने गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संतप्त, जलसमाधी आंदोलन चिघळण्याची भिती

By नरेश डोंगरे | Updated: December 13, 2025 20:23 IST

मंत्र्याच्या दालनात मिटिंगला बोलविले : मिटिंग न घेताच परत पाठविले

लोकमत न्युज नेटवर्क नागपूर : जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी विधीमंडळात गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना बैठकीला बोलविले. मात्र, बैठक न घेताच त्यांना परत पाठविले. यामुळे संतप्त झालेल्या शिष्टमंडळाने 'अब होगा रण, आर-पार जाणदार' अशी घोषणा देऊन भंडाऱ्याचा मार्ग धरला. या एकूणच प्रकारामुळे जलसमाधी आंदोलन चिघळण्याची भिती निर्माण झाली आहे.

संबंधित प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याचे पाहून 'जलसमाधी आंदोलन'करण्याचा निर्णय घोषित केला. १२ डिसेंबर २०२५ पासून हे आंदोलन सुरू होणार होते. त्यानुसार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी लीना फलके यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर प्रभारी जिल्हाधिकारी जाधव यांच्या मार्फत पुनर्वसन अधिकारी फलके आणि तहसिलदार संदीप माकोडे यांनी या शिष्टमंडळाला पत्र दिले. 'तुमच्या मागण्यांच्या संबंधाने प्रकल्पग्र्तांच्या शिष्टमंडळासोबत १३ डिसेंबर दुपारी ३ वाजता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात बैठक घेऊन उचित निर्णय घेण्यात येईल, असे या पत्रात नमूद होते. त्यानुसार, प्रकल्पग्रस्त समितीचे भाऊ कातोरे, दिलीप मडामे, अभिषेक लेंडे, आरजू मेश्राम, कृष्णा केवट, अतुल राघोर्ते, प्रमिलाताई शहारे, मनीषा भांडारकर, यशवंत टीचकुले आणि एजाजअली सय्यद आदी प्रतिनिधी आज दुपारी ३ वाजता मंत्री महाजन यांच्या दालनासमोर पोहचले.

विशेष म्हणजे, यावेळी महाजन यांची त्यांच्या दालनात अमरावती आणि कोकणातील प्रतिनिधी, अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू होती. काही वेळेनंतर महसुलमंत्री बावणकुळेदेखिल तेथे पोहचले. मात्र, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समितीच्या प्रतिनिधींसोबत कसलीही बैठक झाली नाही. विलंब होत असल्याचे पाहून प्रतिनिधींनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याशी संपर्क केला. त्यांनी चाैकशी केली असता गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांची आज बैठक नाही, असे कळले. यामुळे प्रकल्पग्रस्त समितीच्या प्रतिनिधींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. आपल्याला भूलथाप दिली, असा निरोप त्यांनी भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना पाठविला आणि तेथून ही मंडळी भंडाऱ्याकडे रवाना झाली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आता आम्ही जलसमाधी आंदोलनाच्या माध्यमातून आरपारची लढाई लढणार असल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या या भूमीकेमुळे जलसमाधी आंदोलन चिघळण्याची भिती व्यक्त होत आहे.

या आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या

शेती-घराला वाढीव आर्थिक मोबदला, वाढीव कुटुंबांना एकमुस्त रक्कम तसेच घरबांधणी अनुदान, रोजगारासाठी बिनव्याजी कर्ज, पूर्नसंचय जलसाठ्याने बाधित होणाऱ्या गावांचे आणि शेतीचे भूसंपादन आणि पुनर्वसन नवीन कायद्याने करावे, नवीन गावठाणात १८ नागरी सुविधा पूर्ण करने, पुनर्वसित कुटुंबांना ३ किलो वॅटचे सोलर पॅनल मोफत देणे, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नव्याने देणे आणि हस्तांतर सुलभ करने, करचखेडा-नेरला-खापरी- रुयाड या गावांचे पुनर्वसन करने. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gosekhurd Project Victims Deceived, Anger Brews, Threatening Jal Samadhi Agitation

Web Summary : Gosekhurd project-affected people are furious after being misled about a meeting with ministers. This broken promise has heightened tensions, raising fears of escalated protests, including a Jal Samadhi agitation. Demands include increased compensation and improved resettlement facilities.
टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन