शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

नागपूरनजीकच्या काटोल भागात गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेसचे चाक तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:41 IST

दिल्ली मार्गावर गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेसचे चाक तुटल्याची घटना रविवारी सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान घडली. ही गाडी नागपूरकडे येत होती. काटोलजवळ सोनखांब ते कोहली स्टेशनच्या मध्ये ही गंभीर घटना घडली. गाडीच्या ए-२ कोचमधील एका रेल्वे कर्मचाऱ्याला ही बाब लक्षात आल्याने त्याने चेन पुलिंग करून ताबडतोब गाडी थांबविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देकोचमधील रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली मार्गावर गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेसचे चाक तुटल्याची घटना रविवारी सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान घडली. ही गाडी नागपूरकडे येत होती. काटोलजवळ सोनखांब ते कोहली स्टेशनच्या मध्ये ही गंभीर घटना घडली. गाडीच्या ए-२ कोचमधील एका रेल्वे कर्मचाऱ्याला ही बाब लक्षात आल्याने त्याने चेन पुलिंग करून ताबडतोब गाडी थांबविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यामुळे नागपूरकडे येणाऱ्या सहा गाड्यांना विलंब झाला.काटोलजवळ सोनखांब व कोहली स्टेशनच्या मध्ये रविवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीकडून येणाऱ्या ट्रेन क्रमांक १५०१५ गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेस ही गाडी नागपूरकडे येत होती. सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान काटोलजवळ गाडीच्या ए-२ कोचच्या चाकाचा तुकडा पडला. त्यामुळे एका मोठा झटका बसला. या कोचमध्ये एक रेल्वेचा कर्मचारीही प्रवास करीत होता. त्यांना काहीतरी गंभीर प्रकार लक्षात आला. त्यांनी अलार्म चेन पुलिंग करून ताबडतोब गाडी थांबविली. खाली उतरुन पाहिल्यानंतर कोचचा चाक खंडीत झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तगेच कन्ट्रोल रुमला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी अ‍ॅक्सीडंट रिलीफ ट्रेन पोहचली व कोच वेगळा करण्याचे काम सुरू करण्यात आले. दुपारी १ वाजतापर्यंत हे काम सुरू होते. एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. मात्र या अपघातामुळे इटारसीकडून नागपूरकडे येणाऱ्या अनेक गाड्या ठप्प पडल्या. यामध्ये १६०९४ लखनउ एक्सप्रेस, २७९२ सिकंदराबाद एक्सप्रेस, २२६९२ राजधानी एक्सप्रेस, १२७२४ तेलंगना एक्सप्रेस, १२४१० गोंडवाना एक्सप्रेस आणि एक अन्य गाडी थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात