शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जुनी नंबरप्लेट असलेल्या वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी; ‘एचएसआरपी’साठी मुदतवाढ

By सुमेध वाघमार | Updated: August 14, 2025 17:45 IST

आता ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत : त्यानंतर कठोर कारवाईचा इशारा

नागपूर : जुन्या वाहनांवर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी)  बसवण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. यानंतरही ज्या वाहनांवर ‘एचएसआरपी’ प्लेट नसेल, त्यांच्यावर १ डिसेंबरपासून वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिला आहे.    

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही मोहीम १ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली असून, तीनदा मुदतवाढ देण्यात आली. विशेष म्हणजे, अंतिम मुदत १५ आॅगस्ट, २०२५ पर्यंत होती. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे ही मुदत वाढवण्यात येत असल्याचे कारण पुढे करीत परिवहन आयुक्त भिमनवार यांनी चौथ्यांदा मुदतवाढ दिली. तसे पत्र गुरुवारी सर्व आरटीओ कार्यालयात धडकले. 

राज्यात ८० टक्के वाहनांना एचएसआरपी बसविणे बाकी‘लोकमत’ने १३ आॅगस्टच्या अंकात ‘मुदत तीन दिवसांवर, राज्यातील ८० टक्के वाहनांवर अजूनही जुन्याच नंबर प्लेट’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसीद्ध केले होते. राज्यातील २ कोटी वाहनचालकांची धाकधूक वाढली होती. मुदतवाढ की दंड?, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु एक दिवसापूर्वीच मुदतवाढीचा निर्णय घेतल्याने जुनी नंबर प्लेट असलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

शहरात अपॉइंटमेंट मिळण्यास उशीरशहरात ‘एचएसआरपी’ लावण्यास अपॉइंटमेंट मिळत नसल्याने तर ग्रामीण भागात फिटमेंट केंद्र उघडण्यास विलंब होत असल्याने तर काही ठिकाणी ही केंद्रे बंदही असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व कारणांमुळे तसेच लोकप्रतिनिधी आणि जनतेकडून आलेल्या मागणीमुळे शासनाने हा निर्णय घेतल्याने परिवहन आयुक्तांनी पत्रात नमुद केले आहे. 

मुदतवाढ असली तरी निर्बंध कायमवाहनधारकांसाठी दिलासा असला तरी, ज्यांनी अजून ‘एचएसआरपी’ बसवलेली नाही, त्यांच्यावर काही निर्बंध आधीच लागू करण्यात आले आहेत. ‘एचएसआरपी’ शिवाय वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढवणे किंवा उतरवणे अशी कामे करता येणार नाहीत. आता यापुढे वाहनांची पुर्ननोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण यांसारखी कामेही (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) थांबवण्यात येणार आहेत.

असे असणार कारवाईचे स्वरूप१ डिसेंबर, २०२५ नंतर ‘एचएसआरपी’ न बसवलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल. तपासणीमध्ये जप्त केलेली वाहने ‘एचएसआरपी’ बसवल्याशिवाय सोडली जाणार नाहीत. ज्या वाहनधारकांना ३० नोव्हेंबरपर्यंत ‘एचएसआरपी’ बसवण्यासाठीची अपॉइंटमेंट मिळाली असेल,  त्यांच्यावर मात्र कारवाई होणार नाही. प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी या निर्णयाबाबत व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, ‘एचएसआरपी’ बाबत तक्रारी असल्यास dytccomp.tpt-mh@gov.in या  ईमेल आयडीवर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर