शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जुनी नंबरप्लेट असलेल्या वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी; ‘एचएसआरपी’साठी मुदतवाढ

By सुमेध वाघमार | Updated: August 14, 2025 17:45 IST

आता ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत : त्यानंतर कठोर कारवाईचा इशारा

नागपूर : जुन्या वाहनांवर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी)  बसवण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. यानंतरही ज्या वाहनांवर ‘एचएसआरपी’ प्लेट नसेल, त्यांच्यावर १ डिसेंबरपासून वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिला आहे.    

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही मोहीम १ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली असून, तीनदा मुदतवाढ देण्यात आली. विशेष म्हणजे, अंतिम मुदत १५ आॅगस्ट, २०२५ पर्यंत होती. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे ही मुदत वाढवण्यात येत असल्याचे कारण पुढे करीत परिवहन आयुक्त भिमनवार यांनी चौथ्यांदा मुदतवाढ दिली. तसे पत्र गुरुवारी सर्व आरटीओ कार्यालयात धडकले. 

राज्यात ८० टक्के वाहनांना एचएसआरपी बसविणे बाकी‘लोकमत’ने १३ आॅगस्टच्या अंकात ‘मुदत तीन दिवसांवर, राज्यातील ८० टक्के वाहनांवर अजूनही जुन्याच नंबर प्लेट’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसीद्ध केले होते. राज्यातील २ कोटी वाहनचालकांची धाकधूक वाढली होती. मुदतवाढ की दंड?, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु एक दिवसापूर्वीच मुदतवाढीचा निर्णय घेतल्याने जुनी नंबर प्लेट असलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

शहरात अपॉइंटमेंट मिळण्यास उशीरशहरात ‘एचएसआरपी’ लावण्यास अपॉइंटमेंट मिळत नसल्याने तर ग्रामीण भागात फिटमेंट केंद्र उघडण्यास विलंब होत असल्याने तर काही ठिकाणी ही केंद्रे बंदही असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व कारणांमुळे तसेच लोकप्रतिनिधी आणि जनतेकडून आलेल्या मागणीमुळे शासनाने हा निर्णय घेतल्याने परिवहन आयुक्तांनी पत्रात नमुद केले आहे. 

मुदतवाढ असली तरी निर्बंध कायमवाहनधारकांसाठी दिलासा असला तरी, ज्यांनी अजून ‘एचएसआरपी’ बसवलेली नाही, त्यांच्यावर काही निर्बंध आधीच लागू करण्यात आले आहेत. ‘एचएसआरपी’ शिवाय वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढवणे किंवा उतरवणे अशी कामे करता येणार नाहीत. आता यापुढे वाहनांची पुर्ननोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण यांसारखी कामेही (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) थांबवण्यात येणार आहेत.

असे असणार कारवाईचे स्वरूप१ डिसेंबर, २०२५ नंतर ‘एचएसआरपी’ न बसवलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल. तपासणीमध्ये जप्त केलेली वाहने ‘एचएसआरपी’ बसवल्याशिवाय सोडली जाणार नाहीत. ज्या वाहनधारकांना ३० नोव्हेंबरपर्यंत ‘एचएसआरपी’ बसवण्यासाठीची अपॉइंटमेंट मिळाली असेल,  त्यांच्यावर मात्र कारवाई होणार नाही. प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी या निर्णयाबाबत व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, ‘एचएसआरपी’ बाबत तक्रारी असल्यास dytccomp.tpt-mh@gov.in या  ईमेल आयडीवर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर