अच्छे दिन आने वाले हैं..
By Admin | Updated: May 16, 2014 00:41 IST2014-05-16T00:41:05+5:302014-05-16T00:41:05+5:30
सर्वच टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित होणार्या निवडणूकपूर्व विश्लेषणाने व्यापारी जगतात उत्साहाचे वातावरण आहे. छोटे-मोठे उद्योगच नव्हे तर देशात किरकोळ व्यवसायात काही वर्षांपासून आलेली ..

अच्छे दिन आने वाले हैं..
बाजारपेठांमध्ये उत्साह : किरकोळ व्यवसायाला गती मिळेल नागपूर : सर्वच टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित होणार्या निवडणूकपूर्व विश्लेषणाने व्यापारी जगतात उत्साहाचे वातावरण आहे. छोटे-मोठे उद्योगच नव्हे तर देशात किरकोळ व्यवसायात काही वर्षांपासून आलेली मरगळ दूर होईल आणि व्यवसायाची नवे दालने खुली होतील, असा सूर उद्योजक आणि किरकोळ व्यापार क्षेत्रातील व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना काढला. इतवारी आणि गांधीबाग बाजारपेठांमधील किराणा, धान्य, खाद्य तेल, रेडिमेड वस्त्र, कापड व्यवसाय, लोखंड बाजार, हार्डवेअर, पेंट, प्लॅस्टिक आदींसह सर्व बाजारपेठांमध्ये केंद्रात नवे सरकार येण्याच्या वृत्ताने उत्साहाचे वातावरण आहे. व्यापार्यांना संचालित करणारे कायदे नकोत निवडणूकपूर्व विश्लेषणे खरी ठरल्यास एनडीएला घोषणापत्रानुसार आश्वासने पूर्ण करावी लागतील. व्यापार्यांना संचालित करणारे कायदे नकोत, असे मत नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे कॅटच्या कार्यक्रमात व्यक्त केले होते. याशिवाय किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूकदारांना स्थान नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या वक्तव्यानुसार एनडीए सरकार सत्तेत आल्याने किरकोळ व्यवसायात ‘अच्छे दिन आने वाले है’ असेच म्हणता येईल, असे मत अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यक्त केले. एनडीए सरकार देशातील किरकोळ व्यापार्यांच्या बाजूने राहील. देशातील किरकोळ व्यापारी अतिशय सक्षम आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाने ते व्यवसाय करण्यास अधिक दक्ष होतील. त्यांच्यासाठी काही विशेष धोरणे राबविण्याची गरज असल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले. सराफा व्यवसायात भरभराट गेल्या काही वर्षांपासून सोन्याचा व्यवसाय मंदीत आला आहे. वाढीव आयात शुल्क हे मुख्य कारण आहे. हे शुल्क रद्द करावे, अशी मागणी देशातील सर्वच सराफा संघटनांनी नेहमीच लावून धरली होती. पण हा कर अजूनही आकारला जात आहे. सराफा व्यवसायाच्या वाढीसाठी सकारात्मक शासकीय धोरणाची गरज आहे. व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारे एनडीए सरकार आयात शुल्क रद्द करेल आणि सराफा व्यवसायात पुन्हा भरभराट येईल, अशी प्रतिक्रिया इतवारी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष रविकांत हरडे यांनी दिली. निर्यात वाढेल एनडीए सरकार सत्तेत येण्याच्या वृत्ताने छोट्या-मोठय़ा उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण असून बाजारात उत्साह आहे.गेल्या काही वर्षांपासून उद्योगांवर आलेले मंदीचे वातावरण दूर होईल. याशिवाय वाढलेली आयात दूर होऊन निर्यातीला वाव मिळेल. सत्तेवर आल्यानंतर काही दिवसात निश्चितच फरक दिसून येईल. केंद्रातील नवीन सरकारमुळे तसेच ऑक्टोबरमध्ये होणार्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारला निश्चितच सकारात्मक निर्णय घ्यावे लागतील. त्याचा फायदा उद्योजकांना होईल. बुटीबोरी इंडस्ट्रीजमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे मत बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.