शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

गोंदिया, भंडाऱ्यात पूर; गावांना पाण्याचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 04:12 IST

मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराने वेढा घातला असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.

भंडारा/नागपूर : संततधार पावसानंतर भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द आणि बावनथडी तर गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी सोडल्याने भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराने वेढा घातला असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर, मोहाडी, पवनी तालुक्यातील नदी तीरावरील अनेक गावांतील घरात पुराचे पाणी शिरले आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद पडले आहेत.गोंदिया जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध जलाशय, इटियाडोह धरण तिरोडा तालुक्यातील चोरखमारा जलाशय ओव्हर फ्लो झाला. तर जिल्ह्यातील सर्व प्रमुख सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा ८० टक्यांवर गेला आहे.गोसेखुर्दच्या विसर्गामुळे गडचिरोलीत पूरगोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगेची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे वैनगंगेच्या उपनद्यांना दाब निर्माण होऊन अनेक मार्ग बंद पडले आहेत. पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. गडचिरोलीपासून ७ किलोमीटरवर असलेल्या पाल नदीच्या पुराचे पाणी आल्याने गडचिरोली-आरमोरी तसेच गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद पडला आहे. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी येथील अनेक शेतांमध्ये वैनगंगेचे पाणी शिरले आहे. पिंपळगाव व चिखलगावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.नागपूर जिल्ह्याला पुराचा वेढानागपूर जिल्ह्यात रात्रभर कोसळलेल्या संततधार पावसामुळे बहुतांश नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कन्हान नदीसह जिल्ह्यातील पेंच, कोलार, जाम व वर्धा या प्रमुख नद्यांना मोठा पूर आला होता. तर खापा शहरासह काही गावांमध्ये कन्हान व पेंच नदीचे पाणी शिरल्याने एसडीआरएफच्या (स्टेट डिझास्टर रिस्पॉण्ड फंड) जवानांची मदत घेण्यात आली. नागपूरजवळील कट्टा येथे घर कोसळून बाजीराव उईके (६०) यांचा मृत्यू झाला. तर अमरावतीमधील झटामझिरी (ता. वरुड) येथे हा युवक तलावात बुडून मृत्युमुखी पडला.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरVidarbhaविदर्भ