दिवाळीनंतर ५६०० रुपयाने स्वस्त झाले सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:51+5:302021-03-04T04:13:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महिलांचे खास आकर्षण असलेले सोन्याचे दागिने आता स्वस्त झाले आहे. दिवाळीनंतर सोन्याची किमात ५६०० ...

Gold falls by Rs 5,600 after Diwali | दिवाळीनंतर ५६०० रुपयाने स्वस्त झाले सोने

दिवाळीनंतर ५६०० रुपयाने स्वस्त झाले सोने

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महिलांचे खास आकर्षण असलेले सोन्याचे दागिने आता स्वस्त झाले आहे. दिवाळीनंतर सोन्याची किमात ५६०० रुपयाने (प्रति दहा ग्राम)ने खाली घसरली आहे. तर चांदीच्या किमती मात्र वाढलेल्या आहेत. चांदी ५ हजार रुपयाने वाढल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत सराफा व्यावसायिक पुढील काही दिवसात किमती वाढण्याची शक्यता असल्याने सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत.

सराफा व्यावसायिकांच्या मते सोन्यावरील २.५ टक्के इम्पोर्ट ड्युटी कमी केल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती सातत्याने खाली येत असल्याने सोन्याच्या किमती खाली येत असल्याचे दिसून येत आहेत. तर चांदीची व्यावसायिक मागणी वाढल्याने याच्या किमतीत वाढ होत आहे. सध्या आकडेवारी पाहिली तर दिवाळीत म्हणजे १४ नोव्हेंबर २०२० रोजी ९९.५ स्टँडर्ड सोने ५१,६०० रुपये प्रति १० ग्रामच्या किमतीवर विकले गेले होते. तर प्रति किलो चांदीची किंमत ६४,००० रुपये इतकी होती. यानंतर सोन्याच्या किमती कमी होऊ लागल्या. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर ३ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर ४८,५०० रुपये प्रति १० ग्राम होते. तर चांदीचे दर ६४ हजार रुपयांवरून ६९ हजार रुपयांवर (प्रति किलो) पोहोचले होते. परंतु यानंतर दर आणखी कमी झाले. आज म्हणजे ३ मार्च रोजी प्रति १० ग्राम सोन्याची किंमत ४६ हजार रुपये इतकी होती. तर चांदी ७० हजार रुपये प्रति किलो इतकी राहिली. या दरावर दागिने बनवल्यास मेकिंग, हॉलमार्क व जीएसटी अतिरिक्त लागतो.

Web Title: Gold falls by Rs 5,600 after Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.