शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

झाडे कापणाऱ्यांना सद्बुद्धी दे रे देवा : अजनी वन वाचविण्यासाठी वृक्षमित्रांचे हवन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 22:23 IST

Ajani van agitationअजनी भागातील पंप हाऊससमाेर हाेमकुंड लागले, त्यात दूध, धूप, तूप टाकून अग्नि पेटला आणि पंडितजी मंत्राेच्चाराने ईश्वराची आराधना करीत हाेते. हे सारे हाेमहवन शांती करण्यासाठी किंवा काैटुंबिक शुभकार्य करण्यासाठी नव्हे तर अजनी वन भागात ताेडण्यात येणारी हजाराे झाडे वाचविण्यासाठी हा खटाटाेप चालला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अजनी भागातील पंप हाऊससमाेर हाेमकुंड लागले, त्यात दूध, धूप, तूप टाकून अग्नि पेटला आणि पंडितजी मंत्राेच्चाराने ईश्वराची आराधना करीत हाेते. हे सारे हाेमहवन शांती करण्यासाठी किंवा काैटुंबिक शुभकार्य करण्यासाठी नव्हे तर अजनी वन भागात ताेडण्यात येणारी हजाराे झाडे वाचविण्यासाठी हा खटाटाेप चालला आहे. वृक्षमित्रांनी थेट देवाला साकडे घातले आहे. निर्माण झालेल्या निसर्गाच्या समस्या दूर करण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज असताना येथे हजाराे झाडे बेमुर्वत कापणाऱ्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी, या भावनेतून अजनी परिसरात हे हाेमहवन करण्यात आले.

एनएचएआयच्या आयएमएस प्रकल्पासाठी अजनी वन परिसरातील हजाराे झाडे ताेडण्यात येत आहेत. एका माहितीप्रमाणे चार टप्प्यात ४० हजारांवर झाडे कापली जाणार आहेत. त्याविराेधात आंदाेलन चालले असून, ‘हम नागपूरकर’ या संघटनेच्या माध्यमातून नगरसेवक मनाेज गावंडे आणि वृक्षमित्र मनीष चांदेकर यांच्या नेतृत्वात हे अनाेखे आंदाेलन करण्यात आले. ग्रीनसिटी म्हणून असलेली नागपूरची ओळख पुसत चालली आहे. राज्य शासनाच्या ‘माजी वसुंधरा माझी जबाबदारी’ या अभियानात नागपूर शहर २८ व्या स्थानावर फेकल्या गेले आहे. अशावेळी असलेली झाडे वाचविणे ही लाेकांची जबाबदारी आहे. विकास कार्याला अडथळा घालण्याचे कारण नाही. पण पर्यावरणाला हानी पाेहोचविणारा विकास काय कामाचा, असा सवाल मनीष चांदेकर यांनी केला. अशा भकास हाेणाऱ्या शहराला ईश्वरानेच वाचवावे, अशी आर्त हाक वृक्षप्रेमींनी दिली.

मनाेज गावंडे म्हणाले, अजनीचा परिसर रेल्वेची जागा आहे आणि याच भागातून ही झाडे कापली जाणार आहेत. त्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गाेयल यांची संमती आहे का, असा सवाल करीत आता पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीच झाडे वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी वृक्षप्रेमी सतीश यादव, भरत यादव, मुकेश शर्मा आदी उपस्थित हाेते.

जन अधिकारतर्फे निषेध

जन अधिकार पार्टीनेही अजनी वनातील वृक्षताेडीचा निषेध केला आहे. विकासाच्या नावाखाली १००-१५० वर्षे जुनी हजाराे झाडे कापून पर्यावरणाची हानी केली जात आहे आणि दुसरीकडे वृक्षलागवड करण्याचा बागुलबुवा करून जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आराेप पार्टीचे वासुदेव चाैधरी यांनी केला. वसुंधरेची हानी करण्याची या सरकारला हाैस आहे का, असा सवाल त्यांनी केला. या निषेध आंदाेलनात सुषमा माैर्य, फिराेज शेख, मुकेश माैर्य, प्रभाकर वानखडे, पंढरी देशमुख, गीता भडकवाडे, गीता दायीर, लता राऊत आदींचा सहभाग हाेता.

टॅग्स :forestजंगलnagpurनागपूर