शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

झाडे कापणाऱ्यांना सद्बुद्धी दे रे देवा : अजनी वन वाचविण्यासाठी वृक्षमित्रांचे हवन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 22:23 IST

Ajani van agitationअजनी भागातील पंप हाऊससमाेर हाेमकुंड लागले, त्यात दूध, धूप, तूप टाकून अग्नि पेटला आणि पंडितजी मंत्राेच्चाराने ईश्वराची आराधना करीत हाेते. हे सारे हाेमहवन शांती करण्यासाठी किंवा काैटुंबिक शुभकार्य करण्यासाठी नव्हे तर अजनी वन भागात ताेडण्यात येणारी हजाराे झाडे वाचविण्यासाठी हा खटाटाेप चालला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अजनी भागातील पंप हाऊससमाेर हाेमकुंड लागले, त्यात दूध, धूप, तूप टाकून अग्नि पेटला आणि पंडितजी मंत्राेच्चाराने ईश्वराची आराधना करीत हाेते. हे सारे हाेमहवन शांती करण्यासाठी किंवा काैटुंबिक शुभकार्य करण्यासाठी नव्हे तर अजनी वन भागात ताेडण्यात येणारी हजाराे झाडे वाचविण्यासाठी हा खटाटाेप चालला आहे. वृक्षमित्रांनी थेट देवाला साकडे घातले आहे. निर्माण झालेल्या निसर्गाच्या समस्या दूर करण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज असताना येथे हजाराे झाडे बेमुर्वत कापणाऱ्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी, या भावनेतून अजनी परिसरात हे हाेमहवन करण्यात आले.

एनएचएआयच्या आयएमएस प्रकल्पासाठी अजनी वन परिसरातील हजाराे झाडे ताेडण्यात येत आहेत. एका माहितीप्रमाणे चार टप्प्यात ४० हजारांवर झाडे कापली जाणार आहेत. त्याविराेधात आंदाेलन चालले असून, ‘हम नागपूरकर’ या संघटनेच्या माध्यमातून नगरसेवक मनाेज गावंडे आणि वृक्षमित्र मनीष चांदेकर यांच्या नेतृत्वात हे अनाेखे आंदाेलन करण्यात आले. ग्रीनसिटी म्हणून असलेली नागपूरची ओळख पुसत चालली आहे. राज्य शासनाच्या ‘माजी वसुंधरा माझी जबाबदारी’ या अभियानात नागपूर शहर २८ व्या स्थानावर फेकल्या गेले आहे. अशावेळी असलेली झाडे वाचविणे ही लाेकांची जबाबदारी आहे. विकास कार्याला अडथळा घालण्याचे कारण नाही. पण पर्यावरणाला हानी पाेहोचविणारा विकास काय कामाचा, असा सवाल मनीष चांदेकर यांनी केला. अशा भकास हाेणाऱ्या शहराला ईश्वरानेच वाचवावे, अशी आर्त हाक वृक्षप्रेमींनी दिली.

मनाेज गावंडे म्हणाले, अजनीचा परिसर रेल्वेची जागा आहे आणि याच भागातून ही झाडे कापली जाणार आहेत. त्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गाेयल यांची संमती आहे का, असा सवाल करीत आता पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीच झाडे वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी वृक्षप्रेमी सतीश यादव, भरत यादव, मुकेश शर्मा आदी उपस्थित हाेते.

जन अधिकारतर्फे निषेध

जन अधिकार पार्टीनेही अजनी वनातील वृक्षताेडीचा निषेध केला आहे. विकासाच्या नावाखाली १००-१५० वर्षे जुनी हजाराे झाडे कापून पर्यावरणाची हानी केली जात आहे आणि दुसरीकडे वृक्षलागवड करण्याचा बागुलबुवा करून जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आराेप पार्टीचे वासुदेव चाैधरी यांनी केला. वसुंधरेची हानी करण्याची या सरकारला हाैस आहे का, असा सवाल त्यांनी केला. या निषेध आंदाेलनात सुषमा माैर्य, फिराेज शेख, मुकेश माैर्य, प्रभाकर वानखडे, पंढरी देशमुख, गीता भडकवाडे, गीता दायीर, लता राऊत आदींचा सहभाग हाेता.

टॅग्स :forestजंगलnagpurनागपूर