शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कोकणातील नाणार प्रकल्प विदर्भाला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:37 IST

कोकणातील नाणार प्रकल्प स्थानिक लोक व काही राजकीय पक्षांच्या विरोधानंतर हा प्रकल्प गुजरातमध्ये पळविण्याचे प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्रात  मंजूर झालेला हा प्रकल्प राज्यातच राहावा व तो विदर्भात यावा, अशी मागणी काटोलचे भाजपाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्देआमदार आशिष देशमुखांची मागणी : मुख्यमंत्री, पेट्रोलियम मंत्र्यांची घेणार भेट

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोकणातील नाणार प्रकल्प स्थानिक लोक व काही राजकीय पक्षांच्या विरोधानंतर हा प्रकल्प गुजरातमध्ये पळविण्याचे प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्रात  मंजूर झालेला हा प्रकल्प राज्यातच राहावा व तो विदर्भात यावा, अशी मागणी काटोलचे भाजपाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले.डॉ. आशिष देशमुख म्हणाले, दीड लाख कोटीपेक्षा अधिक थेट विदेशी गुंतवणुकीतून हा प्रकल्प रत्नागिरीच्या नाणार येथे पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र शिवसेना आणि कोकणी जनतेच्या प्रखर विरोधामुळे प्रकल्प ठप्प पडला. विदर्भासारख्या अविकसित प्रदेशात तो झाल्यास येथील कार्गो हब, विमानसेवा, उद्योग, रेल्वे, व्यापाराला चालना मिळेल. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दीड लाख रोजगारनिर्मिती होईल. यामुळे हा प्रकल्प विदर्भात व्हावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले होते. नुकतेच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही कोकणातील जाहीर सभेत हा प्रकल्प विदर्भात हलविण्यास संमती दर्शविली. काटोलजवळ एमआयडीसीची जमीन आणि पाणी उपलब्ध असून सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा. हा प्रकल्प गुजरातला पळविण्याच्या चर्चेकडे लक्ष वेधत यादृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भाचा कायापालट करणारा हा प्रकल्प विदर्भात होण्यासाठी प्रसंगी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेऊ, असेही ते म्हणाले. देशात सहा रिफायनरी प्रकल्प आहेत. हा प्रकल्प उभारताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास प्रदूषणाची समस्याही उद्भवणार नसल्याचे वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी सांगितले. सरकारला घरचा अहेरशासनातील नेत्यांकडून औद्योगिकीकरण व रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने विदर्भाच्या विकासाबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. काम सुरू आहे, रोजगार सुरू झाले, असे सांगितले जाते, मात्र तसे चित्र अजिबात दिसून येत नाही. उद्योगाच्या नावाने केवळ जागा बळकावण्यात आल्या. रामदेवबाबांचा पतंजली प्रकल्प मार्च २०१७ मध्ये सुरू होईल, असे सांगण्यात आले. मात्र तेथे कम्पाऊंड व गोडाऊन निर्मितीशिवाय काहीच झाले नाही. परिणामी रोजगारासाठी तरुणांच्या स्थलांतरणामुळे एक लोकसभा मतदारसंघ कमी झाल्याची टीका करीत आशिष देशमुखांनी भाजपला घरचा अहेर दिला आहे.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखnagpurनागपूर