शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पेंच धरणाचे पाणी शेतकऱ्यांना द्या : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:41 IST

पेंच धरणातून नागपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पण शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होत नाही. महापालिका प्रशासनाने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी व पेंच धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनाकरिता व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी किसान बचाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

ठळक मुद्देकिसान बचाव कृती समिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेंच धरणातून नागपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पण शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होत नाही. महापालिका प्रशासनाने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी व पेंच धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनाकरिता व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी किसान बचाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.तुळशीराम कोठेकर, रामू खंडाईत, धनराज वलोकर, मुरली खंडाळा यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चामध्ये जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, अमोल देशमुख, सदानंद निमकर, राम नेवले, अरुण केदार, माजी सभापती टेकचंद सावरकर आदी सहभागी झाले होते. मोर्चाच्या पूर्वी शेतकऱ्यांनी संविधान चौकात धरणे दिले. त्यानंतर संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला. समितीतर्फे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये चौराई धरणासंदर्भात महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारमध्ये झालेल्या करारानुसार पाणी देण्यात यावे. मौजा लोहघोगरी, कन्हान नदी ते तोतलाडोह धरण अंडरग्राऊंड टनेलरूपाने कॅनाल प्रकल्पास वन व इतर सर्व आवश्यक प्रस्तावास मंजुरी देऊन जलद गतीने प्रकल्प पूर्ण करावे. नागपूर शहराची पाणीपुरवठ्याची स्वतंत्र सोय महापालिकेने करावी. कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन मंजूर करून, अटी शर्थी शिथिल कराव्यात. सिंचन व्यवस्थापन न झाल्यास महाराष्ट्र शासन जलसिंचन विभागाकडून प्रति हेक्टरी २५ हजार अनुदान साहाय्य मंजूर करावे. कन्हान नदीतून बिड, चिचघाट, सिहोरा, बाबदेव, मौदा, उपसा सिंचन प्रकल्प २०१९ च्या खरीप पीकाकरिता पूर्ण करण्यात यावे. शेतीपयोगी रासायनिक खते, कीटकनाशके माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या यावेळी मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या. मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMorchaमोर्चाWaterपाणी