शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

पेंच धरणाचे पाणी शेतकऱ्यांना द्या : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:41 IST

पेंच धरणातून नागपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पण शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होत नाही. महापालिका प्रशासनाने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी व पेंच धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनाकरिता व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी किसान बचाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

ठळक मुद्देकिसान बचाव कृती समिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेंच धरणातून नागपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पण शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होत नाही. महापालिका प्रशासनाने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी व पेंच धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनाकरिता व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी किसान बचाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.तुळशीराम कोठेकर, रामू खंडाईत, धनराज वलोकर, मुरली खंडाळा यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चामध्ये जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, अमोल देशमुख, सदानंद निमकर, राम नेवले, अरुण केदार, माजी सभापती टेकचंद सावरकर आदी सहभागी झाले होते. मोर्चाच्या पूर्वी शेतकऱ्यांनी संविधान चौकात धरणे दिले. त्यानंतर संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला. समितीतर्फे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये चौराई धरणासंदर्भात महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारमध्ये झालेल्या करारानुसार पाणी देण्यात यावे. मौजा लोहघोगरी, कन्हान नदी ते तोतलाडोह धरण अंडरग्राऊंड टनेलरूपाने कॅनाल प्रकल्पास वन व इतर सर्व आवश्यक प्रस्तावास मंजुरी देऊन जलद गतीने प्रकल्प पूर्ण करावे. नागपूर शहराची पाणीपुरवठ्याची स्वतंत्र सोय महापालिकेने करावी. कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन मंजूर करून, अटी शर्थी शिथिल कराव्यात. सिंचन व्यवस्थापन न झाल्यास महाराष्ट्र शासन जलसिंचन विभागाकडून प्रति हेक्टरी २५ हजार अनुदान साहाय्य मंजूर करावे. कन्हान नदीतून बिड, चिचघाट, सिहोरा, बाबदेव, मौदा, उपसा सिंचन प्रकल्प २०१९ च्या खरीप पीकाकरिता पूर्ण करण्यात यावे. शेतीपयोगी रासायनिक खते, कीटकनाशके माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या यावेळी मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या. मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMorchaमोर्चाWaterपाणी