शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पेंच धरणाचे पाणी शेतकऱ्यांना द्या : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:41 IST

पेंच धरणातून नागपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पण शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होत नाही. महापालिका प्रशासनाने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी व पेंच धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनाकरिता व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी किसान बचाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

ठळक मुद्देकिसान बचाव कृती समिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेंच धरणातून नागपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पण शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होत नाही. महापालिका प्रशासनाने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी व पेंच धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनाकरिता व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी किसान बचाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.तुळशीराम कोठेकर, रामू खंडाईत, धनराज वलोकर, मुरली खंडाळा यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चामध्ये जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, अमोल देशमुख, सदानंद निमकर, राम नेवले, अरुण केदार, माजी सभापती टेकचंद सावरकर आदी सहभागी झाले होते. मोर्चाच्या पूर्वी शेतकऱ्यांनी संविधान चौकात धरणे दिले. त्यानंतर संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला. समितीतर्फे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये चौराई धरणासंदर्भात महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारमध्ये झालेल्या करारानुसार पाणी देण्यात यावे. मौजा लोहघोगरी, कन्हान नदी ते तोतलाडोह धरण अंडरग्राऊंड टनेलरूपाने कॅनाल प्रकल्पास वन व इतर सर्व आवश्यक प्रस्तावास मंजुरी देऊन जलद गतीने प्रकल्प पूर्ण करावे. नागपूर शहराची पाणीपुरवठ्याची स्वतंत्र सोय महापालिकेने करावी. कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन मंजूर करून, अटी शर्थी शिथिल कराव्यात. सिंचन व्यवस्थापन न झाल्यास महाराष्ट्र शासन जलसिंचन विभागाकडून प्रति हेक्टरी २५ हजार अनुदान साहाय्य मंजूर करावे. कन्हान नदीतून बिड, चिचघाट, सिहोरा, बाबदेव, मौदा, उपसा सिंचन प्रकल्प २०१९ च्या खरीप पीकाकरिता पूर्ण करण्यात यावे. शेतीपयोगी रासायनिक खते, कीटकनाशके माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या यावेळी मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या. मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMorchaमोर्चाWaterपाणी