शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:57 IST

हायकोर्टाचा आदेश : विलंब केल्यामुळे सरकारची कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकोला येथील २४८ शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत तीन महिन्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला. तसेच, या शेतकऱ्यांना सात वर्षापासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवल्यामुळे सरकारची कानउघाडणी केली. 

यासंदर्भात सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये आणि शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करून पुन्हा शेती करण्यासाठी सक्षम करणे या उद्देशातून राज्य सरकारने २०१७ साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती. सोसायटीच्या २४८ शेतकरी सदस्यांना या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी २२९ सदस्यांना एक लाख ५० हजारांपर्यंत तर,१९ सदस्यांना २५ हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार होती. हा लाभ तातडीने मिळणे अपेक्षित होते. परंतु, राज्य सरकारने या शेतकऱ्यांना सात वर्षांपासून झुलवत ठेवले आहे. त्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ देण्यात आला नाही. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता सरकारवर प्रचंड नाराजी व्यक्त करून संबंधित आदेश दिला.

कारवाई करण्याचा इशारा

न्यायालयाने या प्रकरणावर येत्या १२ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करून राज्य सरकारला या तारखेपर्यंत आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्यास सांगितले. तसेच, आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास आणि त्यासंदर्भात असमाधानकारक स्पष्टीकरण मिळाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर अवमान कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

तांत्रिक कारणे अमान्य केली

पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी झालेल्या विलंबाकरिता राज्य सरकारने न्यायालयाला पोर्टल समस्येसह विविध तांत्रिक कारणे सांगितली. तसेच, महाआयटी कंपनीने राज्य सरकारला सादर केलेला प्रस्ताव मंजूर होताच लाभवाटपासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही दिली. परंतु, यामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. न्यायालयाने सरकारचे स्पष्टीकरण अमान्य केले.

टॅग्स :nagpurनागपूरAkolaअकोलाfarmingशेतीFarmerशेतकरीHigh Courtउच्च न्यायालय