शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वकिली व्यवसायाला सेवाभावी वृत्तीची जोड द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:06 IST

कोणताही व्यवसाय हा सेवाभावी वृत्तीने करायला पाहिजे. वकिली व्यवसायाला सुध्दा सेवाभावी वृत्तीची जोड असल्यास यशस्वी होता येईल, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

ठळक मुद्देन्या. भूषण गवई : वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रमाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणताही व्यवसाय हा सेवाभावी वृत्तीने करायला पाहिजे. वकिली व्यवसायाला सुध्दा सेवाभावी वृत्तीची जोड असल्यास यशस्वी होता येईल, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.नागपूर जिल्हा बार असोसिएशन आणि अ‍ॅड. एम. आर. डागा स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा न्यायमंदिरातील न्यायाधीश सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, प्रमुख जिल्हा न्यायाधीश विलास डोंगरे, वरिष्ठ वकील अविनाश गुप्ता, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे उपस्थित होते.न्या. गवई म्हणाले की अ‍ॅड. एम. आर. डागा राज्यातील ख्यातनाम फौजदारी वकील होते. सेशन कोर्ट, हायकोर्ट तसेच सुप्रीम कोर्टात काम करण्याची त्यांची वेगळी कार्यशैली होती. बचाव पक्षाची मुद्देसूद बाजू मांडत होते. ही त्यांच्यातील कला वकिलांना मार्गदर्शन ठरणारी आहे. बचाव पक्षाची बाजू त्यांनी अनेकदा नि:शुल्क लढली. सेशन कोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी काही प्रकरणे नि:शुल्क लढविली. न्यायालयात आपली बाजू मांडताना ते कधी चढ्या आवाजाने बोलत नव्हते. त्यांनी आपली बाजू नेहमी नम्रपणे मांडली होती. ते वयाने मला वडिलधारे होते. ज्यावेळी मी सरकारी वकील होतो, त्यावेळी गोेंदिया येथे एका खून प्रकरणाच्या ट्रायलमध्ये ते बचाव पक्षाकडून तर मी सरकारतर्फे बाजू मांडत होतो. बहुदा दोन्ही वकील कोर्ट रूममध्ये प्रकरणात एकमेकांच्या विरोधात असतात आणि कोर्ट रूमबाहेरही विरोधात असतात. परंतु गोंदिया येथे सुनावणीनंतर त्यांनी मला आवाज दिला आणि मित्रासारखे बोलले. त्यांच्यात वैरभाव आणि शत्रुत्वाची भावना नव्हती. ते मित्रत्वाने नेहमी वागले. वकिलापेक्षा ते एक चांगले व्यक्ती होते. ते स्वत: इन्स्टिट्युशन होते. असे गुण फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या स्मरणार्थ वकिलांसाठी विविध कार्यक्रम जिल्हा बार असोसिएनशन आणि समितीतर्फे राबविण्यात येणार आहे, ही आनंदाची बाब आहे.अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, कारागृहातून साध्या पोस्ट कार्डवर अ‍ॅड. एम. आर. डागा यांना पत्र मिळाले तरी ते त्यांच्यासाठी न्यायालयात बाजू मांडत होते. कारागृहात त्यांना देव मानले जात होते.याप्रसंगी न्या. प्रसन्ना वराळे, न्या. सुनील शुक्रे, न्या. विनय देशपांडे, न्या. रोहित देव तसेच हायकोटर्चिे मुख्य सरकारी वकील सुमंत देवपुजारी, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्यासह मोठ्या प्रमाणात वकील वर्ग उपस्थित होता. संचालन अ‍ॅड. राधिका बजाज यांनी केले. आभार अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी मानले.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर