शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

विकसित जिल्ह्यांना १५ टक्के व अविकसित जिल्ह्यांना ८५ टक्के निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2023 21:49 IST

Nagpur News आता विकसित जिल्ह्यांना १५ टक्के व अविकसित जिल्ह्यांच्या विकासासाठी ८५ टक्के निधी देण्याची खरी गरज असल्याचे सांगत राज्यकर्ते शोषित प्रदेशांना झुकते माप देणार की नाही, असा सवाल अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केला.

नागपूर : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ, नंदूरबार, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड, जालना, लातूर, धुळे हे जिल्हे दरडोई उत्पन्नात बरेच मागे आहेत. केंद्रीकृत विकासाचे मॉडेल महाराष्ट्रातील राजनेते बदलू इच्छित नाही. मुंबई, पुणे, नवी मुंबई, रायगडची मुंबई, औरंगाबाद व नागपूर या जिल्ह्यांपुरता विकास मर्यादित झाला आहे. त्यामुळे आता विकसित जिल्ह्यांना १५ टक्के व अविकसित जिल्ह्यांच्या विकासासाठी ८५ टक्के निधी देण्याची खरी गरज असल्याचे सांगत राज्यकर्ते शोषित प्रदेशांना झुकते माप देणार की नाही, असा सवाल अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केला.

डॉ. खांदेवाले म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने दरडोई उत्पन्नाची आकडेवारी समोर आली. कमी दरडोई उत्पन्न असलेले बहुतांश जिल्हे विदर्भ-मराठवाड्यातील आहेत. समतोल विकासासाठी १९९४ मध्ये वैधानिक मंडळांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, त्यानंतरही विकासाची प्रक्रिया भांडवलशाही बाजार व्यवस्थेत मागास जिल्ह्यांपर्यंत पोहोचली नाही. पुण्याच्या जास्त औद्योगिकीकरणाचे शिंतोडे औरंगाबादपर्यंत येतात. ते विदर्भापर्यंत येतच नाही. हे बाजार व्यवस्थेचे सत्य आहे. ही व्यवस्था बदलण्याची राज्यकर्त्यांची इच्छा नाही. त्यामुळेच एकाच राज्यातील काही जिल्हे विकसित करताना काही जिल्हे विकासात बरेच मागे पडल्याचे दिसते. ब्रिटिशांच्या काळात वऱ्हाडचे सर्वाधिक शोषण झाले. तेथील शेतसारा वसुलीचा दर अयोध्या व बंगालपेक्षा जास्त होता. शोषित प्रदेशांना विकासाच्या प्रक्रियेत कधी झुकते माप दिले का, त्यांना आपण काहीच देत नाही व मागे राहिले म्हणून बोट ठेवतो, असे करून आपण एकाच महाराष्ट्रात दोन महाराष्ट्र तयार करीत आहोत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

अल्प उत्पन्न जिल्ह्यात उद्योग उभारा 

- २०२३-२४ चा आर्थिक पाहणी अहवालच सांगतो की विकासाचा दर कमी होईल. आता विकास दर वाढविण्याच्या स्पर्धेत प्रगत जिल्ह्यांवर अधिक भर दिला जाईल व अशावेळी पुन्हा अल्पविकसित जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होईल. सरकारला विकासाचा प्राधान्य क्रम ठरवावा लागेल. जेथे खूप विकास झाला, उद्योग उभारले गेले तेथेच पुन्हा लक्ष देणार की जे विकासात मागे राहिले तेथे लक्ष देणार, हा मूळ प्रश्न आहे. अतिवृष्टी व अववृष्टी होते. दरडोई उत्पन्नात मागे असलेले सर्व जिल्हे शेतीवर अवलंबून असलेले जिल्हे आहेत. त्यासाठी सरकारने योग्य कार्यक्रम राबवायला हवा. या जिल्ह्यात उद्योग उभारणीला प्राधान्य द्यायला हवे.

- डॉ. श्रीनिवास खांदेवाले

टॅग्स :Vidarbhaविदर्भSocialसामाजिक