शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विकसित जिल्ह्यांना १५ टक्के व अविकसित जिल्ह्यांना ८५ टक्के निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2023 21:49 IST

Nagpur News आता विकसित जिल्ह्यांना १५ टक्के व अविकसित जिल्ह्यांच्या विकासासाठी ८५ टक्के निधी देण्याची खरी गरज असल्याचे सांगत राज्यकर्ते शोषित प्रदेशांना झुकते माप देणार की नाही, असा सवाल अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केला.

नागपूर : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ, नंदूरबार, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड, जालना, लातूर, धुळे हे जिल्हे दरडोई उत्पन्नात बरेच मागे आहेत. केंद्रीकृत विकासाचे मॉडेल महाराष्ट्रातील राजनेते बदलू इच्छित नाही. मुंबई, पुणे, नवी मुंबई, रायगडची मुंबई, औरंगाबाद व नागपूर या जिल्ह्यांपुरता विकास मर्यादित झाला आहे. त्यामुळे आता विकसित जिल्ह्यांना १५ टक्के व अविकसित जिल्ह्यांच्या विकासासाठी ८५ टक्के निधी देण्याची खरी गरज असल्याचे सांगत राज्यकर्ते शोषित प्रदेशांना झुकते माप देणार की नाही, असा सवाल अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केला.

डॉ. खांदेवाले म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने दरडोई उत्पन्नाची आकडेवारी समोर आली. कमी दरडोई उत्पन्न असलेले बहुतांश जिल्हे विदर्भ-मराठवाड्यातील आहेत. समतोल विकासासाठी १९९४ मध्ये वैधानिक मंडळांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, त्यानंतरही विकासाची प्रक्रिया भांडवलशाही बाजार व्यवस्थेत मागास जिल्ह्यांपर्यंत पोहोचली नाही. पुण्याच्या जास्त औद्योगिकीकरणाचे शिंतोडे औरंगाबादपर्यंत येतात. ते विदर्भापर्यंत येतच नाही. हे बाजार व्यवस्थेचे सत्य आहे. ही व्यवस्था बदलण्याची राज्यकर्त्यांची इच्छा नाही. त्यामुळेच एकाच राज्यातील काही जिल्हे विकसित करताना काही जिल्हे विकासात बरेच मागे पडल्याचे दिसते. ब्रिटिशांच्या काळात वऱ्हाडचे सर्वाधिक शोषण झाले. तेथील शेतसारा वसुलीचा दर अयोध्या व बंगालपेक्षा जास्त होता. शोषित प्रदेशांना विकासाच्या प्रक्रियेत कधी झुकते माप दिले का, त्यांना आपण काहीच देत नाही व मागे राहिले म्हणून बोट ठेवतो, असे करून आपण एकाच महाराष्ट्रात दोन महाराष्ट्र तयार करीत आहोत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

अल्प उत्पन्न जिल्ह्यात उद्योग उभारा 

- २०२३-२४ चा आर्थिक पाहणी अहवालच सांगतो की विकासाचा दर कमी होईल. आता विकास दर वाढविण्याच्या स्पर्धेत प्रगत जिल्ह्यांवर अधिक भर दिला जाईल व अशावेळी पुन्हा अल्पविकसित जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होईल. सरकारला विकासाचा प्राधान्य क्रम ठरवावा लागेल. जेथे खूप विकास झाला, उद्योग उभारले गेले तेथेच पुन्हा लक्ष देणार की जे विकासात मागे राहिले तेथे लक्ष देणार, हा मूळ प्रश्न आहे. अतिवृष्टी व अववृष्टी होते. दरडोई उत्पन्नात मागे असलेले सर्व जिल्हे शेतीवर अवलंबून असलेले जिल्हे आहेत. त्यासाठी सरकारने योग्य कार्यक्रम राबवायला हवा. या जिल्ह्यात उद्योग उभारणीला प्राधान्य द्यायला हवे.

- डॉ. श्रीनिवास खांदेवाले

टॅग्स :Vidarbhaविदर्भSocialसामाजिक