शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
7
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
8
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
9
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
10
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
11
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
12
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
13
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
14
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
15
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
16
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
17
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
18
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
19
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
20
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?

विकसित जिल्ह्यांना १५ टक्के व अविकसित जिल्ह्यांना ८५ टक्के निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2023 21:49 IST

Nagpur News आता विकसित जिल्ह्यांना १५ टक्के व अविकसित जिल्ह्यांच्या विकासासाठी ८५ टक्के निधी देण्याची खरी गरज असल्याचे सांगत राज्यकर्ते शोषित प्रदेशांना झुकते माप देणार की नाही, असा सवाल अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केला.

नागपूर : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ, नंदूरबार, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड, जालना, लातूर, धुळे हे जिल्हे दरडोई उत्पन्नात बरेच मागे आहेत. केंद्रीकृत विकासाचे मॉडेल महाराष्ट्रातील राजनेते बदलू इच्छित नाही. मुंबई, पुणे, नवी मुंबई, रायगडची मुंबई, औरंगाबाद व नागपूर या जिल्ह्यांपुरता विकास मर्यादित झाला आहे. त्यामुळे आता विकसित जिल्ह्यांना १५ टक्के व अविकसित जिल्ह्यांच्या विकासासाठी ८५ टक्के निधी देण्याची खरी गरज असल्याचे सांगत राज्यकर्ते शोषित प्रदेशांना झुकते माप देणार की नाही, असा सवाल अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केला.

डॉ. खांदेवाले म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने दरडोई उत्पन्नाची आकडेवारी समोर आली. कमी दरडोई उत्पन्न असलेले बहुतांश जिल्हे विदर्भ-मराठवाड्यातील आहेत. समतोल विकासासाठी १९९४ मध्ये वैधानिक मंडळांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, त्यानंतरही विकासाची प्रक्रिया भांडवलशाही बाजार व्यवस्थेत मागास जिल्ह्यांपर्यंत पोहोचली नाही. पुण्याच्या जास्त औद्योगिकीकरणाचे शिंतोडे औरंगाबादपर्यंत येतात. ते विदर्भापर्यंत येतच नाही. हे बाजार व्यवस्थेचे सत्य आहे. ही व्यवस्था बदलण्याची राज्यकर्त्यांची इच्छा नाही. त्यामुळेच एकाच राज्यातील काही जिल्हे विकसित करताना काही जिल्हे विकासात बरेच मागे पडल्याचे दिसते. ब्रिटिशांच्या काळात वऱ्हाडचे सर्वाधिक शोषण झाले. तेथील शेतसारा वसुलीचा दर अयोध्या व बंगालपेक्षा जास्त होता. शोषित प्रदेशांना विकासाच्या प्रक्रियेत कधी झुकते माप दिले का, त्यांना आपण काहीच देत नाही व मागे राहिले म्हणून बोट ठेवतो, असे करून आपण एकाच महाराष्ट्रात दोन महाराष्ट्र तयार करीत आहोत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

अल्प उत्पन्न जिल्ह्यात उद्योग उभारा 

- २०२३-२४ चा आर्थिक पाहणी अहवालच सांगतो की विकासाचा दर कमी होईल. आता विकास दर वाढविण्याच्या स्पर्धेत प्रगत जिल्ह्यांवर अधिक भर दिला जाईल व अशावेळी पुन्हा अल्पविकसित जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होईल. सरकारला विकासाचा प्राधान्य क्रम ठरवावा लागेल. जेथे खूप विकास झाला, उद्योग उभारले गेले तेथेच पुन्हा लक्ष देणार की जे विकासात मागे राहिले तेथे लक्ष देणार, हा मूळ प्रश्न आहे. अतिवृष्टी व अववृष्टी होते. दरडोई उत्पन्नात मागे असलेले सर्व जिल्हे शेतीवर अवलंबून असलेले जिल्हे आहेत. त्यासाठी सरकारने योग्य कार्यक्रम राबवायला हवा. या जिल्ह्यात उद्योग उभारणीला प्राधान्य द्यायला हवे.

- डॉ. श्रीनिवास खांदेवाले

टॅग्स :Vidarbhaविदर्भSocialसामाजिक