शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
3
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
4
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
5
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
6
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
7
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
8
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
9
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
10
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
11
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
12
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
14
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
15
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
16
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
17
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
18
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
19
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
20
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी

आरक्षणाच्या लढ्यासाठी सज्ज व्हा

By admin | Updated: July 27, 2015 04:11 IST

देशात लोकशाही असली तरी त्यावर भांडवलदारांचे नियंत्रण आहे. आरक्षणाच्या नावाखाली जातीजातीत भांडणे लावून

सुधीर सावंत : आरक्षण संघर्ष परिषदेत आवाहननागपूर : देशात लोकशाही असली तरी त्यावर भांडवलदारांचे नियंत्रण आहे. आरक्षणाच्या नावाखाली जातीजातीत भांडणे लावून उद्योगपती मजा मारीत आहेत. जातीनिहाय आरक्षणाचा कायदा व्हावा, यासाठी बहुजन समाजाने लढ्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन आरक्षण संघर्ष परिषदेत ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी रविवारी केले. २६ जुलै हा आरक्षणदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने समता सैनिक दल, समता एम्प्लॉईज फेडरेशन, संविधान मोर्चा, ओबीसी सेवा संघ, फुले-आंबेडकरी राष्ट्रीय युवक संघटना व आरक्षणसमर्थक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी समता एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश अनिल वैद्य तर सत्कारमूर्ती विजय मेश्राम व प्रदीप ढोबळे आदी उपस्थित होते.समता हा संविधानाचा मूळ आत्मा आहे, या हेतूनेच अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात आले आहे. परंतु फुले, शाहू व आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या आरक्षणाला धक्का लावण्याचे कटकारस्थान सुरू आहे. ते हाणून पाडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायव्यवस्था संविधानाची संरक्षक आहे. मग या व्यवस्थेत आरक्षण का नाही. आरक्षणाच्या नावाखाली ओबीसी विरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अशी भांडणे लावण्याचा प्रकार सुरू आहे. वास्तविक या घटकांना नोकऱ्या व शिक्षण संस्थात आरक्षण आहे. परंतु ओबीसीला शिष्यवृत्ती देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. यामुळेच अजित पवारांचे सरकार गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारही तेच करीत आहे. त्यांनी ओबीसींच्या सवलतींना विरोध केला तर त्यांचेही सरकार असेच जाईल. कुंभमेळ्यासाठी तीन हजार कोटींची तरतूद होते. परंतु ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सरकारकडे २५० कोटी नसल्याची टीका ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी केली. यावेळी नरेंद्र जारोंडे यांनी पदोन्नतीतील आरक्षण, विजय शिंदे यांनी मराठा आरक्षण, अजित पाशा यांनी मुस्लीम आरक्षण, मुकुंद अडेवार यांनी भटके विमुक्तांचे आरक्षण, अनिल वैद्य, गिरधर गजबे, अ‍ॅड. गुणरत्न रामटेके, हरीश नागदिवे, सरिता गायकवाड, प्रतिभा केचे, गणेश भोईर व अस्मिता अभ्यंकर आदींनी विविध विषयांवरील आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. परिषदेत विविध ठराव पारित करण्यात आले. (प्रतिनिधी)