शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तुम्ही शुद्ध हवेसाठी नव्हे, दम्यासाठी घराबाहेर पडताय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 07:30 IST

Nagpur News शुद्ध हवेसाठी बाहेर पडत असाल तर सावध व्हा.. बाहेरची हवा खरोखरीच तितकी शुद्ध राहिली आहे का हे जाणून घ्या..

 

 

नागपूर : वायू प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. प्रदूषणासाठी कारणीभूत कार्बन डायऑक्साईड, नायट्राेजन, सल्फर डायऑक्साईड, ओझाेनसारख्या घटकांचे प्रमाण कमी असले तरी सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर (धुलिकण) हे प्रदूषणाचे सर्वात माेठे कारण ठरले आहे. अशात शहरातील हिरवळ कमी हाेत असल्याने ही वायू प्रदूषणाची समस्या अधिक तीव्रतेने वाढत आहे.

शहराचा एअर क्वाॅलिटी इन्डेक्स १३० ते १७०

नागपूर शहराचे इन्डेक्स १३० ते १७० एक्यूआयच्या सरासरीत असते. सध्या ११० ते १२० एक्यूआयच्या दरम्यान नाेंद केली जात आहे. मात्र दिवाळी, हाेळी, नवीन वर्षाच्या काळात यामध्ये २०० च्यावर ३०० एक्यूआयपर्यंत वाढ नाेंदविण्यात येते, जी धाेकादायक आहे.

इन्डेक्स १०० पेक्षा कमी हवा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकानुसार, एअर क्वाॅलिटी इन्डेक्स १०० च्या खाली असणे समाधानकारक मानले जाते. शहराचा सध्याचा इन्डेक्स हा माॅडरेटस्तरावर आहे. त्यात २०० पर्यंत वाढ झाल्यास धाेकादायक ठरताे.

कारणे काय?

माेठ्या प्रमाणात हाेत असलेले बांधकाम सर्वाधिक कारणीभूत आहे. उड्डाणपूल, मेट्राे, सिमेंट रस्ते यांचे काम वेगाने हाेत आहे. शहरालगत असलेले दाेन औष्णिक वीज केंद्राचे प्रदूषण धाेकादायक ठरले आहे.

घराबाहेर जाल, तर आजारी पडाल

खराब हवेमुळे अस्थमा, श्वसनाचे आजार व फुफ्फुसाचे आजार बळावण्याचा धाेका असताे. शिवाय डाेळ्यात जळजळ, त्वचेचे आजार, रक्तदाबात बदल, ॲलर्जी आदींच्या समस्या निर्माण हाेतात. कर्कराेगाचा धाेकाही असताे.

हवेची गुणवत्ता कशी सुधारणार?

सर्व नऊ स्टेशनचा डेटा घेऊन सरासरी काढल्यानंतरच येथील प्रदूषणावर भाष्य करता येईल. मात्र नागपूरसारख्या शहरात वायू गुणवत्ता माेजण्यासाठी किमान २० स्टेशन असणे आवश्यक आहे.

- काैस्तुभ चटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजिल

अवैध वृक्षकटाई शहरात प्रदूषण वाढण्यास कारणीभूत आहे. विकास कामासाठी झाडांचा बळी हमखास जाताे. वृक्षताेड हाेत राहिली तर नागपूरची ग्रीन सिटी ही ओळख पुसली जाईल.

- अनसूया काळे-छाबरानी, स्वच्छ असाेसिएशन

प्रशासन काय करतेय?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एसआरओ आनंद काटाेले म्हणाले, शहरातील एअर क्वाॅलिटी माॅनिटरिंग सिस्टीम सुधारली जात आहे. महाल, एलआयटी व व्हीएनआयटी भागात तीन नवीन वायू परीक्षण केंद्र सुरू करण्यात आले असून, वाडी व कामठीचे स्टेशनही सुरू केले आहे. शहरासाठी ॲक्शन प्लॅन तयार असून, नागपूर क्लीन सिटी निधीअंतर्गत एमपीसीबीसह नीरी, महापालिका व आरटीओ यांच्या सहकार्याने ताे राबविला जाईल.

टॅग्स :pollutionप्रदूषण