शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जनरेशन झेडचा संताप, सोशल मीडियाविना श्वास घेता येतो का?

By राजेश शेगोकार | Updated: September 15, 2025 15:38 IST

Nagpur : सोशल मीडियावर बंदी म्हणजे नळाला कुलूप लावून पाणी थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न. लोक तहानलेलेच राहतात आणि तहान वाढली की तोडफोड करून नळ फोडतात. बंदी ही समस्या सोडवत नाही; ती समस्या अधिक तीव्र करते. भविष्यातील धोका याच ठिकाणी दडलेला आहे.

राजेश शेगोकारनागपूर :नेपाळमध्येसोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय झाला आणि काही क्षणांतच तरुणाईच्या शिरांत जणू बारूद पेटले. संसद जळाली, राष्ट्रपती भवन जळाले, न्यायालय जळाले आणि अखेरीस पंतप्रधानांची खुर्चीही राख झाली. हा केवळ एक राजकीय प्रसंग नव्हता; ही होती एका पिढीची हतबल किंकाळी.

जनरेशन झेड म्हणजे ज्यांचा जन्मच इंटरनेटच्या प्रकाशात झाला. ज्यांनी बालपणात हातात खेळणी कमी आणि मोबाइल स्क्रीन जास्त पाहिले. ज्यांनी पहिले शब्द उच्चारले तो यूट्यूबवरचा गाणं ऐकून, ज्यांनी पहिले मित्र मिळवले ते फेसबुक-इन्स्टाग्रामवर, ज्यांची पहिली ओळख झाली ती स्वतःच्या प्रोफाइल पिक्चरवर. अशी पिढी अचानक सोशल मीडियाशिवाय ठेवली, अशा पिढीला अचानक 'तुमचे जग बंद' असे सांगितले, तर ते जणू माशाला पाण्याबाहेर टाकल्यासारखे आहे. ते तडफडणारच, ती पिढी कशी शांत बसणार? त्यांच्या दृष्टीने सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही; तो त्यांचा श्वास आहे, ओळख आहे, स्वतःला व्यक्त करण्याची एकमेव खिडकी आहे.

पण या मानसिकतेचे दोन टोक आहेत. एका बाजूला आपल्या भावी पिढीचे आयुष्य केवळ डिजिटल जगावर उभे राहणार का? हा मोठा प्रश्न आहे. लाइक्स म्हणजे प्रेम, फॉलोअर्स म्हणजे सन्मान आणि बंदी म्हणजे अस्तित्व हरवणे, हे समीकरण कितपत टिकाऊ आहे? एका कुटुंबात जेवताना चार जण टेबलाभोवती बसतात; पण प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो. समोर बसलेला मुलगा बापाशी बोलत नाही; पण पाचशे किलोमीटर दूरच्या मित्राशी मेसेजिंग करतो. ही मानसिकता अधिक प्रबळ होत असल्याची आजची वस्तुस्थिती आहे.

दुसऱ्या बाजूला सोशल मीडियामुळे त्यांना जागतिक दृष्टिकोन, ज्ञान आणि नव्या संधी उपलब्ध होत आहेत. छोट्या खेड्यातला युवक आज डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले कौशल्य दाखवून जगभरात पोहोचू शकतो. सामाजिक न्याय, पर्यावरण, लैंगिक समानता अशा विषयांवर आवाज उठवण्यात जनरेशन झेड पुढे आहे. जनरेशन झेडची ताकद नाकारता येणार नाही; पण हीच ऊर्जा जर संतापाच्या ज्वालामुखीतून बाहेर पडली, तर ती फक्त उजेड देणार नाही तर राखही करून टाकेल हा इशाराही जगाला मिळाला आहे.

जर ही पिढी केवळ डिजिटल अस्तित्वाशी बांधली गेली, तर वास्तवातील आव्हानांचा सामना करण्याची त्यांची क्षमता कमी होईल. आंदोलन करणे, तोडफोड करणे किंवा सत्ता उलथून टाकणे हे उपाय नाहीत.

त्याऐवजी सोशल मीडियाचे महत्त्व नाकारता कामा नये; पण त्याचा उपयोग सकारात्मक, सर्जनशील आणि लोकशाही बळकट करणाऱ्या मार्गाने व्हावा याकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणूनच गरज आहे संवादाची.

सत्ताधीशांनी तरुणाईला शत्रू न मानता भागीदार मानले पाहिजे. आभासी जग आणि वास्तव जग यांच्यामध्ये पूल बांधणे आवश्यक आहे. कारण ही पिढी बदल घडवणारी आहे प्रश्न इतकाच आहे की तो बदल रचनात्मक असेल का विध्वंसक ?

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाNepalनेपाळnagpurनागपूर