शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

'गटार' हे वाड्मयीन ताकत सिद्ध करणारे नाटक - डॉ. भालचंद्र जोशी

By आनंद डेकाटे | Updated: August 30, 2023 16:28 IST

वीरेंद्र गणवीर लिखीत गटार' या पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : नागपुरातील १९७७-७८ च्या काळातील आमच्या समांतर कला चळवळीतील स्ट्रीट प्ले रंगभूमीच्या आशयाचे सामाजिक बांधिलकीचे आणि व्यवस्था परिवर्तनाचे सूत्र दलित रंगभूमी बरोबर आम्ही प्रभावीपणे प्रवाहित राखले. आता वीरेंद्र गणवीर यांच्या बहुजन रंगभूमीने केलेला त्याचा विस्तार व विकास हे विदर्भाचे नाट्य वैभव आणि वैदर्भीय समांतर रंगभूमी बरोबरच महाराष्ट्राच्या रंगभुमीचे ते वैशिष्ट्य आहे, असे उद्गार डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी येथे काढले.

'गटार' या वीरेंद्र गणवीर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सायंटिफिक सभागृहात अगोदर 'गटार' या बहुपुरस्कृत नाटकाचा ७५ वा प्रयोग आणि नंतर त्या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. विचारपीठावर ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे, प्रख्यात हिंदी लेखक,समीक्षक डॉ. विमल थोरात, प्रगतिशील लेखक संघाचे प्रसेनजित तेलंग, बोधी प्रकाशनच्या संचालक अर्चना खोब्रागडे व लेखक वीरेंद्र गणवीर होते.

डॉ. विमल थोरात म्हणाल्या, विषमतेतून निर्माण जातिव्यवस्थेने विशिष्टच जातीवर लादलेले घाण उपसण्याचे काम हे त्यांना मानवाधिकारांपासून वंचित राखते, ती व्यवस्था उलथवून टाकण्याचे आवाहन ही नाट्यकृती प्रभावीपणे करते.

डॉ. रविंद्र शोभणे म्हणाले, लोकभावनांचा अवमान हा एक नवा प्रवाह पुढे आला असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपी वर सर्व लोक आपआपल्या तऱ्हेने नको ते विश्लेषण मांडताहेत. प्रास्ताविक स्वतः लेखक, दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर यांनी केले. संचालन शांतरक्षित गावंडे यांनी तर अस्मिता पाटिल यांनी आभार मानले.

टॅग्स :Theatreनाटकliteratureसाहित्यVidarbhaविदर्भnagpurनागपूर