शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

coronavirus; कचऱ्यामुळे आरोग्याला फास; आता बास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:26 IST

नागपूर शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निघतो. यासाठी आठ हजार कर्मचारी गोळा करण्यासाठी लागतात. त्यांच्यावर शंभराहून अधिक अधिकारी लक्ष ठेवतात. ५२५ लहान-मोठी वाहने हा कचरा वाहून नेतात, तरीही शहरात कचरा पडलेला असतोच.

ठळक मुद्देरोजचा कचरा ११५० टन‘कचरा फेका कुठेही’ बंद होण्याची गरजविल्हेवाट लावण्यासाठी वर्षाला ७२ कोटी येतो खर्च

गणेश हूड ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचऱ्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. कचऱ्यातील जंतू वातावरणात पसरून आजार निर्माण करतात. कचरा दुर्गंधी पसरवतो, सौंदर्य बिघडवतो. असे सगळे लहानपणापासून आपण शिकलेलो असतानाही कचरा तयार करायचा व तो कुठेही कसाही फेकून द्यायचा काही थांबायला तयार नाही. कोरोनासारख्या साथीच्या पार्श्वभूमीवर हे सगळे बंद होण्याची गरज आहे.शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निघतो. यासाठी आठ हजार कर्मचारी गोळा करण्यासाठी लागतात. त्यांच्यावर शंभराहून अधिक अधिकारी लक्ष ठेवतात. ५२५ लहान-मोठी वाहने हा कचरा वाहून नेतात, तरीही शहरात कचरा पडलेला असतोच.कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका वर्षाला ७२ कोटी रुपये खर्च करते. तरीही कचरा रोज तयार होतच असतो व दुर्गंधी पसरवीत असतो. शहरातील कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे साठविला जातो. यातील १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्माण केले जाते. उर्वरित १००० ते १०५० मेट्रिक टन कचरा तसाच साठविला जातो. त्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. भांडेवाडी येथे साठून असलेल्या हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प हाती घेतला आहे. यावर काही कोटी खर्च येणार आहे. मनपाने स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर कंटेनर मुक्त केले आहे. नवीन दोन कंपन्यांची कचरा संकलनासाठी नियुक्ती केली आहे.

नागरिकही तेवढेच दोषी...इतका कचरा निर्माण होतोच कसा, या गहन प्रश्नासोबतच ‘तो कुठेही कसाही टाकला कसा जातो’? याची उकल मनपा प्रशासनाला होत नाही. याचे उत्तर त्यांच्या व्यवस्थेत दोष आहेतच. याचबरोबर नागरिकही तेवढेच दोषी आहेत, हेही तितकेच खरे. सार्वजनिक ठिकाणी मोकळी जागा दिसली की घरातील कचरा तेथे आणून टाकला जातो. कचरा तयार होणारच, हे समजल्यावर त्याची विल्हेवाटही व्यवस्थित लावायला हवी. हेही समजायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळेच महापालिकेने कितीही प्रयत्न केले तरीही कचºयाची समस्या काही संपायला तयार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGarbage Disposal Issueकचरा प्रश्न