शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; कचऱ्यामुळे आरोग्याला फास; आता बास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:26 IST

नागपूर शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निघतो. यासाठी आठ हजार कर्मचारी गोळा करण्यासाठी लागतात. त्यांच्यावर शंभराहून अधिक अधिकारी लक्ष ठेवतात. ५२५ लहान-मोठी वाहने हा कचरा वाहून नेतात, तरीही शहरात कचरा पडलेला असतोच.

ठळक मुद्देरोजचा कचरा ११५० टन‘कचरा फेका कुठेही’ बंद होण्याची गरजविल्हेवाट लावण्यासाठी वर्षाला ७२ कोटी येतो खर्च

गणेश हूड ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचऱ्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. कचऱ्यातील जंतू वातावरणात पसरून आजार निर्माण करतात. कचरा दुर्गंधी पसरवतो, सौंदर्य बिघडवतो. असे सगळे लहानपणापासून आपण शिकलेलो असतानाही कचरा तयार करायचा व तो कुठेही कसाही फेकून द्यायचा काही थांबायला तयार नाही. कोरोनासारख्या साथीच्या पार्श्वभूमीवर हे सगळे बंद होण्याची गरज आहे.शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निघतो. यासाठी आठ हजार कर्मचारी गोळा करण्यासाठी लागतात. त्यांच्यावर शंभराहून अधिक अधिकारी लक्ष ठेवतात. ५२५ लहान-मोठी वाहने हा कचरा वाहून नेतात, तरीही शहरात कचरा पडलेला असतोच.कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका वर्षाला ७२ कोटी रुपये खर्च करते. तरीही कचरा रोज तयार होतच असतो व दुर्गंधी पसरवीत असतो. शहरातील कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे साठविला जातो. यातील १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्माण केले जाते. उर्वरित १००० ते १०५० मेट्रिक टन कचरा तसाच साठविला जातो. त्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. भांडेवाडी येथे साठून असलेल्या हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प हाती घेतला आहे. यावर काही कोटी खर्च येणार आहे. मनपाने स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर कंटेनर मुक्त केले आहे. नवीन दोन कंपन्यांची कचरा संकलनासाठी नियुक्ती केली आहे.

नागरिकही तेवढेच दोषी...इतका कचरा निर्माण होतोच कसा, या गहन प्रश्नासोबतच ‘तो कुठेही कसाही टाकला कसा जातो’? याची उकल मनपा प्रशासनाला होत नाही. याचे उत्तर त्यांच्या व्यवस्थेत दोष आहेतच. याचबरोबर नागरिकही तेवढेच दोषी आहेत, हेही तितकेच खरे. सार्वजनिक ठिकाणी मोकळी जागा दिसली की घरातील कचरा तेथे आणून टाकला जातो. कचरा तयार होणारच, हे समजल्यावर त्याची विल्हेवाटही व्यवस्थित लावायला हवी. हेही समजायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळेच महापालिकेने कितीही प्रयत्न केले तरीही कचºयाची समस्या काही संपायला तयार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGarbage Disposal Issueकचरा प्रश्न