शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

coronavirus; कचऱ्यामुळे आरोग्याला फास; आता बास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:26 IST

नागपूर शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निघतो. यासाठी आठ हजार कर्मचारी गोळा करण्यासाठी लागतात. त्यांच्यावर शंभराहून अधिक अधिकारी लक्ष ठेवतात. ५२५ लहान-मोठी वाहने हा कचरा वाहून नेतात, तरीही शहरात कचरा पडलेला असतोच.

ठळक मुद्देरोजचा कचरा ११५० टन‘कचरा फेका कुठेही’ बंद होण्याची गरजविल्हेवाट लावण्यासाठी वर्षाला ७२ कोटी येतो खर्च

गणेश हूड ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचऱ्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. कचऱ्यातील जंतू वातावरणात पसरून आजार निर्माण करतात. कचरा दुर्गंधी पसरवतो, सौंदर्य बिघडवतो. असे सगळे लहानपणापासून आपण शिकलेलो असतानाही कचरा तयार करायचा व तो कुठेही कसाही फेकून द्यायचा काही थांबायला तयार नाही. कोरोनासारख्या साथीच्या पार्श्वभूमीवर हे सगळे बंद होण्याची गरज आहे.शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निघतो. यासाठी आठ हजार कर्मचारी गोळा करण्यासाठी लागतात. त्यांच्यावर शंभराहून अधिक अधिकारी लक्ष ठेवतात. ५२५ लहान-मोठी वाहने हा कचरा वाहून नेतात, तरीही शहरात कचरा पडलेला असतोच.कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका वर्षाला ७२ कोटी रुपये खर्च करते. तरीही कचरा रोज तयार होतच असतो व दुर्गंधी पसरवीत असतो. शहरातील कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे साठविला जातो. यातील १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्माण केले जाते. उर्वरित १००० ते १०५० मेट्रिक टन कचरा तसाच साठविला जातो. त्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. भांडेवाडी येथे साठून असलेल्या हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प हाती घेतला आहे. यावर काही कोटी खर्च येणार आहे. मनपाने स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर कंटेनर मुक्त केले आहे. नवीन दोन कंपन्यांची कचरा संकलनासाठी नियुक्ती केली आहे.

नागरिकही तेवढेच दोषी...इतका कचरा निर्माण होतोच कसा, या गहन प्रश्नासोबतच ‘तो कुठेही कसाही टाकला कसा जातो’? याची उकल मनपा प्रशासनाला होत नाही. याचे उत्तर त्यांच्या व्यवस्थेत दोष आहेतच. याचबरोबर नागरिकही तेवढेच दोषी आहेत, हेही तितकेच खरे. सार्वजनिक ठिकाणी मोकळी जागा दिसली की घरातील कचरा तेथे आणून टाकला जातो. कचरा तयार होणारच, हे समजल्यावर त्याची विल्हेवाटही व्यवस्थित लावायला हवी. हेही समजायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळेच महापालिकेने कितीही प्रयत्न केले तरीही कचºयाची समस्या काही संपायला तयार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGarbage Disposal Issueकचरा प्रश्न