शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

स्लममधील विद्यार्थ्यांच्या दारात शिक्षणाची गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:09 IST

नूतन भारत शाळेचा मोबाइल स्कूल उपक्रम : वस्त्यावस्त्यांमध्ये भरताहेत वर्ग नागपूर : कोरोना महामारीमुळे शाळाच बंद असल्याने विद्यार्थ्यांचे ...

नूतन भारत शाळेचा मोबाइल स्कूल उपक्रम : वस्त्यावस्त्यांमध्ये भरताहेत वर्ग

नागपूर : कोरोना महामारीमुळे शाळाच बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुटल्यासारखे झाले आहे. ऑनलाइनद्वारे वर्ग घेण्याचा काहीसा तोटका प्रयत्न काही शाळांकडून केला जातोय. पण गरीब विद्यार्थी ऑनलाइन वर्गापासून दूरच आहेत. ही बाब अभ्यंकरनगरातील नूतन भारत विद्यालयाच्या लक्षात आली. त्यांनी मोबाइल शाळा उपक्रमाद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या दारात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविली. आता घराशेजारीच भरणाऱ्या मोबाइल शाळेमुळे हे विद्यार्थी परत शिक्षणाच्या प्रवाहात आले आहे.

शहरातील गणेशनगर, नारायणनगर, भीमनगर, वैशालीनगर, जयताळा, एकात्मतानगरात दररोज सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान रस्त्यावर, झाडाच्या खाली नियमित शाळा भरत आहे. शाळा बंद असल्याने स्लम भागातील आठव्या, नवव्या वर्गातील मुली ह्या आईबरोबर घरकाम करायला लागल्या होत्या. मुले आजूबाजूच्या दुकानात काम करायला लागले होते. ते शिक्षणापासून दूर जात असल्याचे शाळेच्या लक्षात आले. त्यामुळे शाळेने त्यांच्या घराशेजारीच वर्ग सुरू केले. या वस्त्यांमध्ये शाळेचे दोन शिक्षक सकाळी जातात. एक शिक्षक प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना दुसरे शिक्षक माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना शिकवितात. कोरोनाचे नियम पाळून दररोज सकाळी तीन तास शाळा नियमित भरत आहे. नूतन भारत विद्यालयाचेच नाही तर स्लम भागातील शेकडो विद्यार्थी शाळा आपल्या दारी या उपक्रमात सहभागी होत आहे.

- पालकही करत आहेत सहकार्य

४ जुलैपासून शाळा सुरू झाली. विद्यार्थीही आता नियमित येऊ लागले आहे. पाऊस आला तर पालकच आम्हाला वर्ग भरविण्यास सहकार्य करतात. पालकांनी स्वत:चे घर, शेड, हॉल उपलब्ध करून दिले आहे. ही शाळा बंद करू नका, असा पालकांकडूनच आग्रह होत असल्याचे शिक्षक सांगतात.

- शाळांनी अशा उपक्रमाचा बोध घेण्याची गरज

कोरोनाकाळात शिक्षण ऑनलाइन की ऑफलाइन, परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, निकालाचे सूत्र काय, यावर भरपूर वाद प्रतिवाद झाले. परंतु विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचत आहे की नाही, विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा विचार कुणी केलेला नाही. परंतु या मोबाइल स्कूलमुळे खऱ्या गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचाविण्यास मदत होत आहे. मोठ्या शाळांनीही अशा उपक्रमाचा बोध घेऊन सामाजिक दायित्व पार पाडण्याची गरज आहे.

- गरीब विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षणाबद्दलची मर्यादा आणि अडचणी लक्षात घेत, आम्ही हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा शेकडो गरीब विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे.

वंदना बडवाईक, प्राचार्य, नूतन भारत विद्यालय