शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाचा राजकीय ‘इव्हेंट’

By admin | Updated: September 1, 2014 17:11 IST

उपराजधानीत दरवर्षीप्रमाणे यंदादेखील गणेशोत्सवाचा उत्साह प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता यंदाच्या गणेशोत्सवात राजकीय मंडळींकडून ‘इमेज बिल्डींग’साठी

इच्छुक उमेदवारांची लगबग : ‘इमेज बिल्डींग’चा फंडा नागपूर : उपराजधानीत दरवर्षीप्रमाणे यंदादेखील गणेशोत्सवाचा उत्साह प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता यंदाच्या गणेशोत्सवात राजकीय मंडळींकडून ‘इमेज बिल्डींग’साठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. अद्याप आचारसंहिता लागू व्हायची असल्यामुळे उपराजधानीतील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षासाठी राजकीय ‘इव्हेंट’ झाला आहे. गणेशोत्सव मंडळांचा परिसर असो, शहरातील निरनिराळे चौक असोत किंवा अगदी ‘सोशल चावडी’, विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून बाप्पाच्या माध्यमातून जनतेला साद घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे राजकीय इव्हेंट होणार असे चित्र होते. सद्यस्थितीला उपराजधानीमध्ये राजकीय फलकबाजीला ऊत आला आहे. इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या छायाचित्रासह गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचे मोठमोठे ‘होर्डिंग’ लावण्यात आले आहेत. एकाच विधानसभा क्षेत्रातून तिकिटासाठी इच्छुक असलेल्या एकाच पक्षाच्या नेत्यांमध्ये या माध्यमातून जनतेशी ‘कनेक्ट’ होण्यासाठी चढाओढ दिसून येत आहे. काही नेत्यांनी गणेशोत्सवादरम्यान नामांकित मंडळांना ‘स्पॉन्सरशीप’ दिली असून निरनिराळ्या स्पर्धांच्या माध्यमातून ते जनतेशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाय नागरिकांसाठी निरनिराळ्या स्वरूपाच्या आकर्षक स्पर्धा आयोजित करण्यावर उमेदवारांचा भर आहे. सोबतच अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या महालक्ष्मीनिमित्त इच्छुक उमेदवारांकडून निरनिराळे उपक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात येत आहे.(प्रतिनिधी)आचारसंहिता, नक्को रे भाऊ!गणेशोत्सवासारख्या उत्सवातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत थेट ‘कनेक्ट’ होण्याची संधी इच्छुक उमेदवारांना मिळते आहे. अशा या धामधुमीत कमीतकमी अनंत चतुर्दशीपर्यंत तरी आदर्श आचारसंहिता लागू व्हायला नको, अशी उपराजधानीतील निरनिराळ्या पक्षांतील कार्यकर्त्यांची भावना आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत नेत्यांचे नाव जनतेपर्यंत पोहोचविण्याची चांगली संधी आहे. जर आचारसंहिता अगोदरच लागू झाली तर नियोजनात ऐनवेळी बदल करावा लागेल, असे मत एका मोठ्या राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.