शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाचा राजकीय ‘इव्हेंट’

By admin | Updated: September 1, 2014 17:11 IST

उपराजधानीत दरवर्षीप्रमाणे यंदादेखील गणेशोत्सवाचा उत्साह प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता यंदाच्या गणेशोत्सवात राजकीय मंडळींकडून ‘इमेज बिल्डींग’साठी

इच्छुक उमेदवारांची लगबग : ‘इमेज बिल्डींग’चा फंडा नागपूर : उपराजधानीत दरवर्षीप्रमाणे यंदादेखील गणेशोत्सवाचा उत्साह प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता यंदाच्या गणेशोत्सवात राजकीय मंडळींकडून ‘इमेज बिल्डींग’साठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. अद्याप आचारसंहिता लागू व्हायची असल्यामुळे उपराजधानीतील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षासाठी राजकीय ‘इव्हेंट’ झाला आहे. गणेशोत्सव मंडळांचा परिसर असो, शहरातील निरनिराळे चौक असोत किंवा अगदी ‘सोशल चावडी’, विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून बाप्पाच्या माध्यमातून जनतेला साद घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे राजकीय इव्हेंट होणार असे चित्र होते. सद्यस्थितीला उपराजधानीमध्ये राजकीय फलकबाजीला ऊत आला आहे. इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या छायाचित्रासह गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचे मोठमोठे ‘होर्डिंग’ लावण्यात आले आहेत. एकाच विधानसभा क्षेत्रातून तिकिटासाठी इच्छुक असलेल्या एकाच पक्षाच्या नेत्यांमध्ये या माध्यमातून जनतेशी ‘कनेक्ट’ होण्यासाठी चढाओढ दिसून येत आहे. काही नेत्यांनी गणेशोत्सवादरम्यान नामांकित मंडळांना ‘स्पॉन्सरशीप’ दिली असून निरनिराळ्या स्पर्धांच्या माध्यमातून ते जनतेशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाय नागरिकांसाठी निरनिराळ्या स्वरूपाच्या आकर्षक स्पर्धा आयोजित करण्यावर उमेदवारांचा भर आहे. सोबतच अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या महालक्ष्मीनिमित्त इच्छुक उमेदवारांकडून निरनिराळे उपक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात येत आहे.(प्रतिनिधी)आचारसंहिता, नक्को रे भाऊ!गणेशोत्सवासारख्या उत्सवातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत थेट ‘कनेक्ट’ होण्याची संधी इच्छुक उमेदवारांना मिळते आहे. अशा या धामधुमीत कमीतकमी अनंत चतुर्दशीपर्यंत तरी आदर्श आचारसंहिता लागू व्हायला नको, अशी उपराजधानीतील निरनिराळ्या पक्षांतील कार्यकर्त्यांची भावना आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत नेत्यांचे नाव जनतेपर्यंत पोहोचविण्याची चांगली संधी आहे. जर आचारसंहिता अगोदरच लागू झाली तर नियोजनात ऐनवेळी बदल करावा लागेल, असे मत एका मोठ्या राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.