शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

गांधी कुटुंबीयाला देशाचा रिमोट कंट्रोल हाती हवा आहे : उमा भारती यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 1:07 AM

काँग्रेस नेतृत्व गैरजबाबदार आहे. त्यांना स्वत:कडे कोणतीही जबाबदारी नको आहे. २०१४ पूर्वी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करून सत्तेचे रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवले होते. गांधी कुटुंबाला कोणतीही जबाबदारी न स्वीकारताच देशावर मालकी हक्क मिळवून ‘रेव्हेन्यू कलेक्शन’ करायचे असल्याचा आरोप भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांनी मंगळवारी केला.

ठळक मुद्देलोधी समाजाचे स्नेहमिलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस नेतृत्व गैरजबाबदार आहे. त्यांना स्वत:कडे कोणतीही जबाबदारी नको आहे. २०१४ पूर्वी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करून सत्तेचे रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवले होते. गांधी कुटुंबाला कोणतीही जबाबदारी न स्वीकारताच देशावर मालकी हक्क मिळवून ‘रेव्हेन्यू कलेक्शन’ करायचे असल्याचा आरोप भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांनी मंगळवारी केला.नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ लोधी क्षेत्रीय समाजाच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम रजवाडा पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उमा भारती उपस्थित होत्या. चौकीदार केवळ श्रीमंतांचाच असतो, प्रियंका गांधी यांच्या या वक्तव्यावर बोलताना उमा भारती म्हणाल्या की, प्रियंका गांधींना चौकीदारचा अर्थ समजला नाही. चौकीदार हा गावातही असतो आणि तो गावात कुठलीही गडबड होणार नाही, यासाठी दक्ष असतो. ‘न खाऊंगा न खाने दुंगा’म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला प्रत्येक शहर आणि गावात चौकीदार ठेवायचा आहे. काँग्रेसचा २०१९ च्या निवडणुकीतील नारा गरिबी हटाव, बेरोजगारी हटावचा आहे. जनतेने खरे तर त्यांनाच विचारले पाहिजे ५० वर्षे देशाची सत्ता भोगल्यानंतरही देशातील गरिबी, बेरोजगारी का नाही हटली. यावेळी आमदार विकास कुंभारे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, किशोर कुमेरिया आदी उपस्थित होते.मी राजकारण सोडले नाहीमला इच्छित ठिकाणी उमेदवारी देण्याची पक्षाची तयारी आहे. त्यानंतर मंत्रिपदही मिळाले असते. पण, गंगा शुद्धिकरणाचे थोडे काम अजूनही शिल्लक आहे. उर्वरित कार्यासाठी मंत्री नाही तर लोकांना जोडणारा दुवा हवा आहे. या कार्यासाठी सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे, म्हणूनच यंदाची निवडणूक लढविली नाही. परंतु पुढच्या निवडणुकीत पक्ष देईल ती जबाबदारी निश्चितच सांभाळेल. राजकारणातील ‘कट ऑफ'ची ७५ वर्षे मानलीत तरी आपल्याकडे अजूनही १७ वर्षे शिल्लक आहेत. सध्या माझी क्रेडिबिलिटी गंगेशी कनेक्ट आहे. पक्षाने मला राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवून माझ्या कार्याचाही सन्मान केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.राममंदिर आमच्या आस्थेचा मुद्दाकाँग्रेस पक्षाकडून राममंदिराच्या मुद्यावर राजकारण होत आहे. राममंदिर हा प्रचाराचा मुद्दा नसून तो आमच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे भाजपाच्या मॅनिफे स्टोमध्ये राममंदिर निर्माणचा समावेश राहणार आहे. त्यांनी नितीन गडकरी यांच्या कामाची स्तुती करीत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनणार असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUma Bhartiउमा भारतीNitin Gadkariनितीन गडकरी