शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नागपूरच्या अजनी रेल्वे कॉलनीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 20:24 IST

पहिल्याच पावसात अजनी रेल्वे वसाहतीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना पहाटे घडल्याने कुठलीही प्राणहानी झाली नाही. दरम्यान नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (एनआरएमयू) पूर्ण कॉलनीतील क्वॉर्टसचे ऑडिट करून धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित क्वॉर्टरमध्ये हलविण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्दे३० वर्षे जुने क्वॉर्टर : सुरक्षित क्वॉर्टरमध्ये रहिवाशांना हलविण्याची संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहिल्याच पावसात अजनी रेल्वे वसाहतीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना पहाटे घडल्याने कुठलीही प्राणहानी झाली नाही. दरम्यान नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (एनआरएमयू) पूर्ण कॉलनीतील क्वॉर्टसचे ऑडिट करून धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित क्वॉर्टरमध्ये हलविण्याची मागणी केली आहे.अजनीतील रेल्वे वसाहत किमान १०० वर्षे जुनी आहे. ज्या इमारतीची गॅलरी कोसळली, ती इमारत ३० वर्षांपूर्वी बांधली आहे. ४ मजली इमारतीत १६ क्वॉर्टर्स आहेत. पहिल्या माळ्यावरील ‘सी’ क्वॉर्टरच्या गॅलरीचा भाग पहाटे कोसळला. येथे सहायक लोको पायलट दिनेश मेश्राम राहतात. घटना पहाटे घडली त्यामुळे कुठला अनुचित प्रकार घडला नाही. पण हीच गॅलरी दिवसा कोसळली असती तर प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. देशात सर्वाधिक महसूल मिळविणाऱ्या रेल्वेचे कर्मचारी गळक्या, पडक्या इमारतीत राहत आहे. या घटनेमुळे क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे प्रशासनाचे या कॉलनीच्या देखभालीकडे लक्ष नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. तक्रारी करुनही विभाग लक्ष देत नाहीया कॉलनीतील अनेक क्वॉर्टसचे छळ गळत आहे. गडर लाईन तुंबल्या आहेत, अनेक क्वॉटर्स जीर्ण झाले आहेत. मात्र अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे संबंधित विभाग लक्ष देत नसल्यांचे रहिवाशांचे म्हणणे आहे. कॉलनीच्या देखभालीसाठी आधी कॉलनी केअर कमिटी होती. या कमिटीत रहिवासी, कर्मचारी संघटना व अधिकारी यांचे प्रतिनिधी असायचे. मात्र आता ही कमिटी राहिली नाही. त्यामुळे देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. येथे यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यात कुणाचा जीव गेला नसला तरी काही जण जखमी झाले. वरिष्ठ मंडळ इंजिनिअरला घेरावमंगळवारी दुपारी वरिष्ठ मंडळ इंजिनियर (समन्वय) पवनकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी एनआरएमयूच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घातला. धोकादायक इमारती आधी दुरुस्त करा तसेच तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर पाटील यांनी योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. येत्या आठ दिवसात काहीच निर्णय न झाल्यास डीआरएम कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी एनआरएमयूचे मंडळ सचिव हबीब खान, मंडळ कोषाध्यक्ष नरेंद्र धानफोले, देवाशिष भट्टाचार्य, ई.व्ही. राव, धनसिंग पाटील, अजय रगडे उपस्थित होते.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर