शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नागपूरच्या अजनी रेल्वे कॉलनीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 20:24 IST

पहिल्याच पावसात अजनी रेल्वे वसाहतीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना पहाटे घडल्याने कुठलीही प्राणहानी झाली नाही. दरम्यान नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (एनआरएमयू) पूर्ण कॉलनीतील क्वॉर्टसचे ऑडिट करून धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित क्वॉर्टरमध्ये हलविण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्दे३० वर्षे जुने क्वॉर्टर : सुरक्षित क्वॉर्टरमध्ये रहिवाशांना हलविण्याची संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहिल्याच पावसात अजनी रेल्वे वसाहतीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना पहाटे घडल्याने कुठलीही प्राणहानी झाली नाही. दरम्यान नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (एनआरएमयू) पूर्ण कॉलनीतील क्वॉर्टसचे ऑडिट करून धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित क्वॉर्टरमध्ये हलविण्याची मागणी केली आहे.अजनीतील रेल्वे वसाहत किमान १०० वर्षे जुनी आहे. ज्या इमारतीची गॅलरी कोसळली, ती इमारत ३० वर्षांपूर्वी बांधली आहे. ४ मजली इमारतीत १६ क्वॉर्टर्स आहेत. पहिल्या माळ्यावरील ‘सी’ क्वॉर्टरच्या गॅलरीचा भाग पहाटे कोसळला. येथे सहायक लोको पायलट दिनेश मेश्राम राहतात. घटना पहाटे घडली त्यामुळे कुठला अनुचित प्रकार घडला नाही. पण हीच गॅलरी दिवसा कोसळली असती तर प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. देशात सर्वाधिक महसूल मिळविणाऱ्या रेल्वेचे कर्मचारी गळक्या, पडक्या इमारतीत राहत आहे. या घटनेमुळे क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे प्रशासनाचे या कॉलनीच्या देखभालीकडे लक्ष नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. तक्रारी करुनही विभाग लक्ष देत नाहीया कॉलनीतील अनेक क्वॉर्टसचे छळ गळत आहे. गडर लाईन तुंबल्या आहेत, अनेक क्वॉटर्स जीर्ण झाले आहेत. मात्र अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे संबंधित विभाग लक्ष देत नसल्यांचे रहिवाशांचे म्हणणे आहे. कॉलनीच्या देखभालीसाठी आधी कॉलनी केअर कमिटी होती. या कमिटीत रहिवासी, कर्मचारी संघटना व अधिकारी यांचे प्रतिनिधी असायचे. मात्र आता ही कमिटी राहिली नाही. त्यामुळे देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. येथे यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यात कुणाचा जीव गेला नसला तरी काही जण जखमी झाले. वरिष्ठ मंडळ इंजिनिअरला घेरावमंगळवारी दुपारी वरिष्ठ मंडळ इंजिनियर (समन्वय) पवनकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी एनआरएमयूच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घातला. धोकादायक इमारती आधी दुरुस्त करा तसेच तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर पाटील यांनी योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. येत्या आठ दिवसात काहीच निर्णय न झाल्यास डीआरएम कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी एनआरएमयूचे मंडळ सचिव हबीब खान, मंडळ कोषाध्यक्ष नरेंद्र धानफोले, देवाशिष भट्टाचार्य, ई.व्ही. राव, धनसिंग पाटील, अजय रगडे उपस्थित होते.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर