गड आला अन् गडकरीही
By Admin | Updated: May 17, 2014 02:18 IST2014-05-17T01:00:56+5:302014-05-17T02:18:07+5:30
भाजपने देशभरात दणदणीत यश मिळवित केंद्रातील सत्तेचा ‘गड’ सर केला आणि नागपुरात राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनीही मोठय़ा मताधिक्याने ‘नागपूर जिंकत’ इतिहास रचला ...

गड आला अन् गडकरीही
विलास मुत्तेमवार व मुकुल वासनिक पराभूत
नागपूर : भाजपने देशभरात दणदणीत यश मिळवित केंद्रातील सत्तेचा ‘गड’ सर केला आणि नागपुरात राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनीही मोठय़ा मताधिक्याने ‘नागपूर जिंकत’ इतिहास रचला तर, ‘मोहीम’ फत्ते करीत शिवसेनेने रामटेकच्या गडावर भगवा फडकविला. देशातील मोदी लाट, गडकरींनी दाखविलेली विकासाची वाट यामुळे मुत्तेमवार यांच्या विजयाचे सारे अंदाज फोल ठरले तर शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी जनसंपर्काच्या बळावर दिल्लीत बसून काँग्रेससाठी ‘प्लॅनिंग‘ आखणार्या खा. मुकुल वासनिक यांचेच‘प्लॅनिंग‘ फेल केले. ‘आप’च्या दमानिया यांचा झाडू चाललाच नाही. फक्त ६९ हजार ८१ मते घेत त्या स्वत:चे डिपॉझिटही वाचवू शकल्या नाहीत. बसपाच्या हत्तीचीही चाल मंदावली. मोहन गायकवाड ९६ हजार ४३५ मतांवर थांबले. रामटेकमध्येही तुमाने यांनी सर्वच विधानसभा मतदारसंघात वासनिक यांना पछाडले. १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी तुमाने विजयी झाले. (प्रतिनिधी)‘ग्लॅमर’ प्राप्त झाले होते. यामुळे लोक आकर्षित झाले.‘मायक्रोप्लानिंग’ केले होते. संस्था, संघटनांना जोडण्यासाठी संघाने आखलेला प्लॅन व्यवस्थित राबविण्यात आला.
नागपुरात गडकरींचा एकतर्फी झंझावात चालला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून गडकरींची गाडी सुसाट धावली. ती अखेरपर्यंत थांबलीच नाही. उत्तर नागपूर, मध्य नागपूर यासारख्या दलित, मुस्लिमबहुल मतदारसंघासह सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळविण्याची किमया गडकरींनी करून दाखविली. त्यांनी मुत्तेमवारांच्या जवळपास दुप्पट मते घेतली. गेल्यावेळी भाजप उमेदवाराला मिळालेल्या एकूण मतांच्या जवळपास गडकरींना निव्वळ मताधिक्य मिळाले आहे.
या कारणांमुळे मिळाला विजय
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवित राष्ट्रीय राजकारणात उडी घेतल्यामुळे गडकरींना एक वेगळे राजकीय
गडकरी नागपूरचा चेहरा बदलू शकतात, असा विश्वास त्यांनी आपल्या कृतीतून जनतेत निर्माण केला. दुसरीकडे मुत्तेमवार चारदा खासदाराहूनही असा विश्वास निर्माण करण्यात कमी पडले.
जिंकल्याचे कारण
गडकरींची विकास पुरुष अशी असलेली इमेज, त्यांनी केलेले सोशल नेटवर्किंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियोजन, पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांचे परिश्रम
हरल्याचे कारण
विकास कामांची छाप सोडली नाही. दलित, मुस्लिम व पारंपरिक मतांवर विसंबून राहिले. पक्ष संघटनेच्या बांधणीकडे दुर्लक्ष, काँग्रेस नेत्यांशी मतभेद.
गडकरी यांच्यासाठी संघाने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली. मतदार यादीतील एका पानासाठी एक प्रमुख नेमून संघाने निवडणुकीसाठी