शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

तलाव बुजले; तलावाच्या दुरुस्तीचा निधीही आटला.. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2022 14:49 IST

सिंचन विभागाची ७.६९ कोटींची मागणी

नागपूर : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांचे दरवाजे उघडावे लागले होते. तलावही ओव्हरफ्लो झाले होते. अतिवृष्टीमुळे काही तलाव फुटले तर काही नादुरुस्त झाले होते. अशा १३५ तलावांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. दुरुस्ती न झाल्यास पुढील वर्षात मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. विचार करता लघु सिंचन विभागाने या तलावांच्या दुरुस्तीसाठी ७.६९ कोटींची मागणी शासनाकडे केली आहे; मात्र चार महिने झाले तरी हा निधी मिळालेला नाही.

जिल्ह्यात ४७० तलाव आहेत. यातील १३७ तलाव नादुरुस्त झाले आहेत. यात उमरेड तालुक्यातील एक तर एक कुही तालुक्यातील तलाव फुटला होता. दुरुस्त न झाल्यास पुढील पावसाळ्यात यापासून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तलावांची दुरुस्ती न झाल्याने सिंचन क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.

नादुरुस्त तलावांची तातडीने दुरुस्ती व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने ७.६९ कोटींची मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तलावांची आपत्कालीन निधीतून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती; मात्र कायमस्वरुपी दुरुस्तीची गरज आहे. अधिकाऱ्यांकडून शासनाकडे यासाठी पाठपुरावा होताना दिसत नाही. यासंदर्भात जलसंधारण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत काँग्रेसच्या गटनेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता; परंतु त्यानंतरही हा निधी प्राप्त झालेला नाही.

निधीचा प्रस्ताव शासनाकडे

अतिवृष्टीचा फटका १३५ तलावांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यासाठी ७.६९ कोटींच्या निधीची गरज आहे. यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे; मात्र शासनाकडून हा निधी प्राप्त झालेला नाही.

तलाव संख्या

जिल्ह्यातील एकूण तलाव ४७०

  • लघु सिंचन-१३४
  • पाझर तलाव-६०
  • गाव तलाव-३९
  • मामा तलाव-२१४
  • साठवण तलाव-२४
टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूरfundsनिधी