शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

पुरपीडितांसाठी विद्यार्थ्यांनी जमा केला निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 20:10 IST

नागपुरातील शासकीय न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही खारीचा वाटा उचलत पूरपीडितांच्या मदतीसाठी निधी जमा करून पाठविला.

ठळक मुद्देफॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव : गरजूंपर्यंत पोहचविली राशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये नुकत्याच आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील लोकांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातील सर्वच स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. आपल्याकडून ‘फूल नाही फुलाची पाकळी’ मदत व्हावी ही भावना ठेवत मदतीसाठी सरसावले असून यात तरुणांचा सहभाग प्रेरणादायी असा राहिला आहे. हीच भावना जोपासत नागपुरातील शासकीय न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही खारीचा वाटा उचलत पूरपीडितांच्या मदतीसाठी निधी जमा करून पाठविला.न्याय वैद्यकशास्त्रच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मालोजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनात या विद्यार्थ्यांनी ११ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या काळात मदत राशी जमा करण्याचे अभियान राबविले. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांकडून थोडा थोडा निधी जमा केला तसेच शहरातील सीताबर्डी, धरमपेठ, महाल, इतवारी आदी परिसरात फिरून लोकांकडून मदत राशी गोळा केली. या मुलांच्या प्रयत्नातून ७० हजाराचा निधी व इतर साहित्य गोळा करण्यात आले व योग्य नियोजनाद्वारे प्रभावित भागात पूरपीडितांसाठी पाठविण्यात आले. विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आर.डी. आत्राम, प्रा. संजय ठाकरे व डॉ. वीरेंद्र शेंडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.या अभियानात विष्णूप्रसाद एन.एम., पूर्वजा गावंडे, अंजली ई.एस., उमेश भोयर, अथुल्या प्रसाद, मीनाक्षी आर.व्ही., दिलीप देव रॉय, नयना टि., दर्शना चापले, पवन चापले, मोनाली पौनीकर, शिवानी गोडके, पवन कल्याण आदी विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मालोजी भोसले यांनी सांगितले की, एनएसएसचा उद्देश केवळ कॅम्प आयोजित करणे हाच नाही तर सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हा सुद्धा आहे. विद्यार्थ्यांनी जो काही निधी उभारून पूरग्रस्तांसाठी पाठविला, यातून त्यांची सामाजिक भावना जागृत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :floodपूरfundsनिधीStudentविद्यार्थी