शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
4
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
5
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
6
Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
7
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
8
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
9
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
10
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
11
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
12
Maharashtta Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
13
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
14
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
15
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
16
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
17
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
18
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
19
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
20
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी

ठगबाजांच्या विळख्यात उपराजधानी; सहा दिवसात १३५ कोटींची फसवणूक उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 7:00 AM

Nagpur News fraud कागदोपत्री घोटाळा करून सामान्यांच्या परिश्रमाच्या कमाईवर हात साफ करणारे ठगबाज नागपूरसाठी धोकादायक ठरत आहेत. नित्य नवे घोटाळे करून हे ठगबाज सामान्यांना कंगाल करत आहेत.

ठळक मुद्दे कंगाल झाल्यावरच पुढे आल्या घटना

जगदीश जोशी

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कागदोपत्री घोटाळा करून सामान्यांच्या परिश्रमाच्या कमाईवर हात साफ करणारे ठगबाज नागपूरसाठी धोकादायक ठरत आहेत. नित्य नवे घोटाळे करून हे ठगबाज सामान्यांना कंगाल करत आहेत. गेल्या सहा दिवसात नोंद झालेल्या दोन प्रकरणात १३५ कोटी रुपयांचा घोटाळा पुढे आला आहे. हा आकडा आर्थिक गुन्हेगारीचे गांभीर्य विषद करणारा आहे.

आर्थिक घोटाळ्यांसाठी नागपूरचे नाव आधीपासूनच चर्चेत आहे. कळमना अर्बन, वासनकर, श्री सूर्या, समीर जोशी, रवी जोशी, झामरे, झाम, नवाेदय बँक, मैत्रेय पत संस्था, चिमणकर यांच्यासारख्यांनी यापूर्वी गरीब व मध्यमवर्गीयांचे हजारो-लाखो रुपये हडप केले आहेत. गुंतवणुकीत भक्कम नफा मिळविण्याच्या लालसेने परिश्रमपूर्वक मिळवलेले धन नागरिकांनी या ठगबाजांच्या हाती सोपवले. कोणी अचल संपत्ती विकून तर कुणी मुलांच्या शिक्षणाचा किंवा मुला-मुलीच्या लग्नासाठी बचत केलेली रक्कम अशा प्रकरणात गमावली. विशेष म्हणजे, हे सगळे प्रकरण गुंतवणूकदार रस्त्यावर उतरल्यावरच उघडकीस आले आहेत. पोलिसांनी स्वत:हून अशा घोटाळेबाजांवर अंकुश लावला, असे एकही प्रकरण गेल्या दोन दशकात दिसून आले नाही, हे विशेष. गेल्या सहा दिवसात नोंद झालेले दोन प्रकरण अशाच स्वरूपाचे आहेत.

यातील पहिले प्रकरण सीताबर्डी येथील आहे. गुंतवणुकीवर तीन टक्के मासिक व्याज आणि बोनस देण्याची लालूच दाखवून सुशिल कोल्हे, त्याचा भाऊ पंकज कोल्हे आणि साथीदार भरत साहू यांनी नागरिकांना ३५ कोटी रुपयांनी ठगवले आहे. कोल्हे बंधूंनी सुरुवातीला इंदोरा येथे कार्यालय थाटले. तीन वर्षे येथे एमएलएम कंपनी चालवली. त्यानंतर २०१८मध्ये सिव्हील लाईन्स येथील उत्कर्ष अपार्टमेंटमध्ये एजीएम कार्पोरेशन चालवत होते. प्रारंभी त्यांनी स्थानिक गुंतवणूकदारांना कंपनीशी जोडले आणि हळूहळू अन्य राज्यातही आपले जाळे पसरवले. डिजिटल मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावावर अनेकांना यात सहभागी करून घेतले. तारांकित हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करून आपले नेटवर्क महाराष्ट्रापासून ते हिमाचल, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, पंजाब आदी राज्यात वाढवले. नागपूरच्या धर्तीवर त्यांनी सर्वच राज्यांमधील गुंतवणूकदारांना प्रारंभावस्थेत लाभ दिला आणि नंतर व्यवसाय गुंडाळला. गेल्या एक वर्षापासून गुंतवणूकदार पोलिसांकडू चकरा मारत होते. मात्र, त्यांना आश्वासनापलिकडे काहीच प्राप्त झाले नाही. अखेर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे विनवणी केली तेव्हा ७ नोव्हेंबरला सीताबर्डी ठाण्यात ३५ कोटी रुपयांच्या ठगवणुकीचे प्रकरण नोंदवले गेले. प्रकरण तापले असल्याचे कळताच कोल्हे बंधू फरार झाले.

अशाच प्रकारचे प्रकरण विजय गुरुनुले याचे आहे. याने ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावावर जवळपास १०० कोटी रुपयांनी सामान्यांना गंडवले आहे. जवळपास पाच वर्षापासून गुरुनुले सामान्यांना विविध योजनांच्या नावाखाली आपल्या सापळ्यात अडकवत होता. प्रतापनगर ठाण्याजवळ मंगलमूर्ती चौकात त्याचे कार्यालय होते. गुरुनुले व त्याचे सहकारी बोगस योजना राबवून जोरदार प्रचार-प्रसार करत होते. यात अनेक लोक अडकले. पोलिसांनाही याचा अंदाजा आला नाही. विशेष म्हणजे गुरुनुले सर्वात आधी गुंतवणूकदारांना सुरक्षा म्हणून दुसऱ्याच्या मालकीच्या फ्लॅटची नोटरी करून देत होता. दरम्यान काही पीडित प्रतापनगर ठाण्यात पोहोचले. पोलिसांच्या सुस्तीची जाणिव असल्याने या पीडितांना मोठ्या अधिकाऱ्यांकडे मदत मागण्यासाठी जावे लागले. त्यांनी अपर आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना हकीकत सांगितली. रेड्डी आणि नुरूल हसन यांच्या निर्देशानुसार सीताबर्डी, अंबाझरी, प्रतापनगर ठाण्यातील पोलीस दलाने गुरुनुलेच्या कार्यालयावर छापा मारला. एवढे सगळे झाल्यावरही गुरुनुलेची माणसे तक्रारकर्त्यांना रक्कम परत करण्यासोबतच अनेक प्रकारची प्रलोभने देत होते. परंतु, पोलीस अधिकाऱ्यांच्या कठोर भूमिकेमुळे आणि तक्रारकर्ता गणेश चाफले यांच्या हिमतीमुळे प्रकरण उघडकीस आले. १३ नोव्हेंबरला चाफले यांच्या तक्रारीवर केवळ १९.३५ लाख रुपयाच्या ठगवणुकीचा गुन्हा नोंदवला गेला. सहा दिवसाच्या तपासानंतर ७० कोटीचा आकडा पुढे आला असून, १०० कोटीपर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रकरणात नऊ आरोपींना अटक झाली आहे.

 

टॅग्स :fraudधोकेबाजी