शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नागपुरातील जय श्रीराम पतसंस्थेत कोट्यवधीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:04 AM

आर्थिक घोटाळ्यासाठी बदनाम झालेल्या उपराजधानीतील आणखी एका पतसंस्थेद्वारा नागरिकांचे कोट्यवधी रुपये बुडविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित गुंतवणूकदारांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी ५० ते ६० लाख रुपयाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. परंतु कोट्यवधी रुपये फसले असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देगुंतवणुकीच्या नावावर फसवणुकीचा आरोप : कोतवाली ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक घोटाळ्यासाठी बदनाम झालेल्या उपराजधानीतील आणखी एका पतसंस्थेद्वारा नागरिकांचे कोट्यवधी रुपये बुडविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित गुंतवणूकदारांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी ५० ते ६० लाख रुपयाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. परंतु कोट्यवधी रुपये फसले असल्याची चर्चा आहे.ताजे प्रकरण हे गणेशनगर तुकडोजी चौक येथील जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे आहे. या सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे रा. रमना मारुती आहे तर मॅनेजर सुनीता पाल आहे. गेल्या १५ वर्षांपासून ही पतसंस्था कार्यरत आहे. येथे फिक्स डिपॉझिट, डेली कलेक्शनसह ग्राहकांची बचत खातेही आहेत. फिक्स डिपॉझिटवर ज्येष्ठ नागरिकांना १२ टक्के तर इतर ग्राहकांना ११ टक्के व्याज दिले जात होते. गुंतवणूकदारांना पतसंस्थेशी जोडण्यासाठी एजंट नियुक्त करण्यात आले होते. त्यांना लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बोनससुद्धा दिला जात होता. पतसंस्थेच्या आकर्षक योजनांमुळे मध्यमवर्गीय आणि सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने या पतसंस्थेशी जुळले.सूत्रानुसार गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पतसंस्थेची स्थिती चांगली नाही. मेहरकुरे यांनी काही दिवसात परिस्थिती सामान्य होईल, असे सांगितल्याने गुंतवणूकदारांनी याला गंभीरतेने घेतले नाही. जानेवारीमध्ये पतसंस्थेची परिस्थिती आणखीनच बिघडली. गुंतवणूकदारांना त्यांनी जमा केलेली रक्कम मिळणे बंद झाले. मेहरकुरे वेगवेगळी कारणे देऊ लागला. गुंतवणूकदार आपल्या पैशांसाठी एजंटांकडे तगादा लावू लागले. दबाब टाकू लागले. तेव्हा थोडे दिवस थांबण्यास सांगण्यात आले. यादरम्यान अचानक पतसंस्थेचे गणेशनगर येथील कार्यालय बंद झाले. यामुळे गुंतवणूकदारंमध्ये खळबळ उडाली. म्हाळगीनगर आणि हुडकेश्वर येथील कार्यालयसुद्धा बंद करण्यात आले. तेव्हा पतसंस्थेत मोठी गडबड झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. ते मेहरकुरे आणि पाल यांच्याकडे चकरा मारू लागले. सुनीता यांनी आपण आजारी असल्याचे सांगत पतसंस्थेच्या कामकाजाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले तर मेहरकुरे हे बोलण्याचे टाळू लागले. दोन महिने चकरा लावल्यानंतर अखेरगुंतवणूकदारांनी मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांनीही त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही. तपासानंतर कारवाई करण्याचे सांगण्यात आले. तेव्हा गुंतवणूकदार संतापले. त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच विरोध दर्शविला.यानंतर पोलिसांनी हालचाल सुरू केली.त्यांनी मेहरकुरे आणि पंतसंस्थेच्या एजंटला बोलावले. मेहरकुरे पोलिसांच्या हाती लागला नाही तर एजंटने पतसंस्था बंद असल्याने पैसे वितरित करण्यात आले नसल्याचे सांगितले. कोतवालीचे ठाणेदार ज्ञानेश्वर भोसले यांनी लोकमतला सांगितले, १२ ते १५ लोकांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची ५० ते ६० लाख रुपयाने फसवणूक करण्यात आली आहे. तपासात इतर पीडितही समोर आल्यास ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.७० गुंतवणूकदार आले समोरसूत्रानुसार मंगळवारी एजंटसह ७० गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शविली. शासकीयस्तरावर फसवणुकीची रक्कम कोट्यवधी आहे. इतर शहरातील लोकांनीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ते अजूनपर्यंत समोर आलेले नाहीत. कोतवाली पोलीस या प्रकरणाला फारसे गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. मेहरकुरे आणि त्याच्या साथीदाराची शिक्षा एजंटला मिळत आहे. गुंतवणूकदार त्यांना त्रास देत आहेत.आर्थिक शाखेचाही परिणाम नाहीशहरात पतसंस्थेद्वारा फसवणूक करण्यात आल्याच्या घटना नेहमीच होत असतात. यावर देखरेख ठेवण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा गठित करण्यात आली आहे. त्यानंतरही असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे आर्थिक शाखेचा पाहिजे तसा प्रभाव पडत नसल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूक