शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त आयुक्तांसह मिळाले चार नवीन उपायुक्त

By admin | Updated: April 30, 2017 01:38 IST

शहरातील चार पोलीस उपायुक्तांच्या शुक्रवारी नागपुरातून बदल्या झाल्या. शिवाय सीआयडी, आरपीटीएस, एसीबी, लोहमार्ग पोलीस अधीक्षकांच्याही बदल्या झाल्या.

सीआयडी, आरपीटीएस आणि एसीबीतही नवीन अधीक्षक येणारनागपूर : शहरातील चार पोलीस उपायुक्तांच्या शुक्रवारी नागपुरातून बदल्या झाल्या. शिवाय सीआयडी, आरपीटीएस, एसीबी, लोहमार्ग पोलीस अधीक्षकांच्याही बदल्या झाल्या. त्यांच्या बदल्यात नागपूरला एक अतिरिक्त आयुक्त आणि चार नवीन पोलीस उपायुक्त मिळाले. तर अन्य ठिकाणीसुद्धा नवीन अधिकारी बदलून येणार आहेत.शुक्रवारी शहरातील रंजनकुमार शर्मा, अभिनाश कुमार आणि दीपाली मासिरकर तसेच राकेश कलासागर या चार पोलीस उपायुक्तांची बदली वेगवेगळ्या ठिकाणी झाली. त्याबदल्यात धुळ्याहून अतिरिक्त आयुक्त एस. दिघावकर, धुळे येथूनच पोलीस उपायुक्त म्हणून एस. चैतन्य, नाशिक (मालेगाव) मधून पोलीस उपायुक्त म्हणून राकेश ओला, जालना येथून पोलीस उपायुक्त म्हणून राहुल माकणीकर आणि सांगलीहून पोलीस उपायुक्त म्हणून कृष्णकांत उपाध्याय हे नवीन अधिकारी नागपुरात बदलून येणार आहेत. दोन ते तीन दिवसात हे सर्व नागपुरात रुजू होणार आहेत.नागपुरातून गेलेले उपायुक्त (कंसात बदलीचे ठिकाण)रंजनकुमार शर्मा (अधीक्षक, अहमदनगर) अभिनाश कुमार (अधीक्षक, अमरावती), दीपाली मासिरकर (सहायक महानिरीक्षक, मुंबई) आणि राकेश कलासागर (अधीक्षक, अकोला) या अधिकाऱ्यांसोबतच गुन्हे अण्वेषण विभागाच्या डॉ. आरती सिंह (अधीक्षक, औरंगाबाद), पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप झळके (अधीक्षक, परभणी), लाचलुचपत विभागाचे अधीक्षक संजय दराडे (अधीक्षक, नाशिक), नागरी हक्क संरक्षण विभागाच्या निर्मलादेवी (अधीक्षक, वर्धा) आणि राज्य महामार्ग विभागाच्या स्वाती भोर यांची आरपीटीएस नागपूरच्या प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली आहे. नागपुरात येणारे अधिकारी (कंसात येथून येणार)अतिरिक्त आयुक्त एस. दिघावकर (धुळे), उपायुक्त एस. चैतन्य (धुळे), कृष्णकांत उपाध्याय (सांगली), राहूल माकणीकर (जालना), राकेश ओला (मालेगाव) हे अधिकारी अनुक्रमे नागपुरात येणार आहेत. याशिवाय पी. आर. पाटील पुण्याहून नागपुरात नागरी हक्क संरक्षण विभागात अधीक्षक, नाशिकचे उपायुक्त व्ही. जी. पाटील गुन्हे अण्वेषण विभागात अधीक्षक म्हणून नागपुरात रुजू होणार आहेत.(प्रतिनिधी) एस. दिघावकर अतिरिक्त आयुक्त दक्षिण विभागधुळ्यात आतापर्यंत राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ६ ची जबाबदारी सांभाळणारे एस. दिघावकर यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर मुंबईत काही काळ नोकरी केली आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून १९८९ ला ते उपअधीक्षक म्हणून रुजू झाले. अकोला, जळगाव, औरंगाबाद, जालना येथे सेवा दिल्यानंतर त्यांना २००१ मध्ये आयपीएस कॅडर मिळाला. उस्मानाबाद, बुलडाणा येथे अधीक्षक तर सोलापुरात उपायुक्त म्हणून सेवा दिली. त्यानंतर ते धुळे येथे राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ६ ची जबाबदारी सांभाळत होते. आता त्यांना पदोन्नती देऊन अतिरिक्त आयुक्त म्हणून सरकारने नागपुरात नियुक्ती दिली आहे. एस. चैतन्य धुळ्यात आतापर्यंत पोलीस अधीक्षकांची जबाबदारी सांभाळणारे एस. चैतन्य मूळचे तेलंगणातील रहिवासी असून, त्यांनी बी.टेक. केले आहे. पोलीस दलाचे आकर्षण असल्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि भारतीय पोलीस दलात त्यांची निवड झाली. २०११ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर, इचलकरंजी येथे सेवा दिल्यानंतर, ११ महिन्यांपूर्वी ते धुळ्याचे अधीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी येथील दारू विक्रेते आणि अवैध धंदेवाल्यांना लगाम लावतानाच हप्तेखोर पोलिसांवरही बदलीचा बडगा उगारला. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.राहुल माकणीकरगेल्या तीन वर्षांपासून जालना येथे माकणीकर कार्यरत आहे. २००८ ते २०१० या कालावधीत ते नंदूरबार तर, २०१० ते २०१३ पर्यंत परभणी, तेथून २०१५ पर्यंत फलटण येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. २०१५ ते मार्च २०१७ पर्यंत ते जालना येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आता नागपुरात ते पोलीस पोलीस उपायुक्त म्हणून सेवा देणार आहेत.