शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चार आरोपींना १० वर्षे कारावास

By admin | Updated: November 10, 2014 00:58 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणात ४ आरोपींना १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

हायकोर्ट : वर्धा जिल्ह्यातील हत्याप्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणात ४ आरोपींना १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दिलीप सुरेश खराडे (२९), प्रशांत शिवाजी खराडे (२५), शिवाजी रामभाऊ खराडे (५३) व गुलाब गोविंदराव खराडे (६४) अशी आरोपींची नावे असून ते सर्व किन्हाळा (बोथली), ता. आर्वी येथील रहिवासी आहेत. वर्धा सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत आजन्म कारावास व प्रत्येकी १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता अपील अंशत: मंजूर करून सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला. आरोपींना कलम ३०२ ऐवजी ३०४-१ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरविले व आजन्म कारावासाची शिक्षा १० वर्षे सश्रम कारावासात परिवर्तित केली. सत्र न्यायालयाचा अन्य आदेश कायम ठेवला.मृताचे नाव बबनराव शिंदे होते. ३१ आॅगस्ट २००८ रोजी आरोपींनी बबनरावची हत्या केली. प्रशांतने तलवारीने वार केला, तर इतरांनी काठ्यांनी मारले. खरांगणा पोलिसांनी घटनेचा तपास केला होता. आरोपींतर्फे अ‍ॅड. एस. व्ही. सिरपूरकर व अ‍ॅड. राजेंद्र डागा, तर शासनातर्फे एपीपी विनोद ठाकरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)