शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

प्रश्नपत्रिकांचा गोंधळ, नियोजन कोलमडल्याने पायाभूत चाचणीचा पेपर रद्द

By गणेश हुड | Updated: August 18, 2023 13:34 IST

जि.प.चा शिक्षण विभाग व डायटची नामुष्की

नागपूर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यातर्फे गाजावाजा सुरू असलेल्या पायाभूत चाचणीचे पेपरच उपलब्ध न झाल्याने गुरुवारी पहिल्या दिवशी काही शाळांमध्ये पायाभूत चाचणीचा पेपर रद्द करण्याची नामुष्की जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) यांच्यावर ओढवली. याला जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही तितकाच जबाबदार आहे.

एमएससीईआरटीतर्फे मागील वर्गाच्या क्षमतांवर आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी १७ ते १९ ऑगस्ट या कालावधीत राज्यभर घेतली जात आहे. परंतु, नियोजन शून्यतेमुळे काही वर्गांच्या प्रश्नोत्तर पत्रिका नागपूर जिल्ह्यातील शाळांना उपलब्ध झालेल्या नाहीत. परिणामी काही विषयांचे पेपर रद्द करण्यात आले. अशीच परिस्थिती अन्य जिल्ह्यांतही आहे.

डायटची नियोजन शून्यता व नागपूर जि. प.च्या शिक्षण विभागाच्या (प्राथ.) बेपर्वा कारभारामुळे इयत्ता तिसरी ते पाचवीच्या प्रश्नोत्तर पत्रिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. तर इयत्ता सहावी ते आठवीच्या प्रश्नोत्तर पत्रिका काही शाळांमध्ये कमी पडल्या. वास्तविक ८ ऑगस्टपूर्वीच या परीक्षेचे पेपर जिल्हास्तरावर पाठविण्यात आल्याचे एमएससीईआरटीने कळविले होते. परंतु, पेपर पुरेशा प्रमाणात आहेत की नाहीत, याची योग्यप्रकारे खातरजमा करण्यात आलेली नाही.

जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी मात्र यासाठी डायटला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष लिलाधर ठाकरे यांनी यासाठी डायट व शिक्षण विभाग दोषी असल्याचे सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळाexamपरीक्षाzpजिल्हा परिषदnagpurनागपूर