शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 20:53 IST

 जनसामान्यांचा नेता रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. हजारे यांच्या निधनाची माहिती कळताच जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या गांधी वॉर्ड येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देसामान्यांचा नेता हरविला 

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर (रामटेक) :  जनसामान्यांचा नेता रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. हजारे यांच्या निधनाची माहिती कळताच जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या गांधी वॉर्ड येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. हजारे यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी, दोन मुले विनोद व सुनील, दोन मुली हेमलता व मंगला असा आप्त परिवार आहे.  हजारे यांनी दोनवेळा विधानसभेत तर एकवेळा विधान परिषद सदस्य म्हणून रामटेकचे प्रतिनिधित्व केले आहे. रामटेक हा काँग्रेसचा गड असताना विरोधी पक्षाचे पहिले आमदार म्हणून हजारे निवडून आले होते. १९८९ साली जनता दलाच्या तिकिटावर त्यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना रामटेक लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज दिली होती. त्यांचा केवळ ३४ हजार ४७० मतांनी पराभव झाला होता.१८ जानेवारी १९२८ रोजी आंबाडी, ता.कुही येथे पांडुरंग हजारे यांचा जन्म झाला होता. त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून इंटर्नपर्यंत शिक्षण घेतले. रामटेकच्या गांधी चौकात १९५२ ते ८६ पर्यंत हजारे यांचे हॉटेल होते. ते हॉटेलवाले हजारे म्हणूनच परिचित होते. शेतीकडे त्यांचे विशेष लक्ष होते. १९७२ साली ते राईस मिलच्या व्यवसायाकडे वळले. बापूजी अणेंच्या मार्गदर्शनात १९५७ साली हजारे यांनी राजकारणात प्रवेश केला. ते वेगळ्या विदर्भाचे खंदे समर्थक होते. त्यामुळे जांबुवंतराव धोटे यांच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात ते सक्रियतेने सहभागी होते. १९६७ साली त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार गुंडेराव महाजन यांच्याविरोधात पहिली  निवडणूक नाग विदर्भ समितीकडून लढविली, परंतु ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश केला. निवडणूक जिंकेपर्यंत लढत राहिले. जनता दलाच्या तिकिटावर ते १९८४ आणि १९८९ साली विधानसभा निवडणूक जिंकले. एकवेळा त्यांना विधान परिषदेमध्येदेखील भाजपाकडून पाठविण्यात आले. खासदारकीसाठी रामटेक लोकसभा मतदार संघातूनही ते लढले. त्यामध्ये त्यांची माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, तेजसिंहराव भोसले, चित्रलेखा भोसले आणि सुबोध मोहिते यांच्याशी लढत झाली. १९९० साली त्यांनी जनता दलाला रामराम करीत बनवारीलाल पुरोहित यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. १९९१ साली भाजपच्या तिकिटावर तेजसिंहराव भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढले. यातही त्यांचा पराभव झाला. 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर