शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 20:53 IST

 जनसामान्यांचा नेता रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. हजारे यांच्या निधनाची माहिती कळताच जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या गांधी वॉर्ड येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देसामान्यांचा नेता हरविला 

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर (रामटेक) :  जनसामान्यांचा नेता रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. हजारे यांच्या निधनाची माहिती कळताच जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या गांधी वॉर्ड येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. हजारे यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी, दोन मुले विनोद व सुनील, दोन मुली हेमलता व मंगला असा आप्त परिवार आहे.  हजारे यांनी दोनवेळा विधानसभेत तर एकवेळा विधान परिषद सदस्य म्हणून रामटेकचे प्रतिनिधित्व केले आहे. रामटेक हा काँग्रेसचा गड असताना विरोधी पक्षाचे पहिले आमदार म्हणून हजारे निवडून आले होते. १९८९ साली जनता दलाच्या तिकिटावर त्यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना रामटेक लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज दिली होती. त्यांचा केवळ ३४ हजार ४७० मतांनी पराभव झाला होता.१८ जानेवारी १९२८ रोजी आंबाडी, ता.कुही येथे पांडुरंग हजारे यांचा जन्म झाला होता. त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून इंटर्नपर्यंत शिक्षण घेतले. रामटेकच्या गांधी चौकात १९५२ ते ८६ पर्यंत हजारे यांचे हॉटेल होते. ते हॉटेलवाले हजारे म्हणूनच परिचित होते. शेतीकडे त्यांचे विशेष लक्ष होते. १९७२ साली ते राईस मिलच्या व्यवसायाकडे वळले. बापूजी अणेंच्या मार्गदर्शनात १९५७ साली हजारे यांनी राजकारणात प्रवेश केला. ते वेगळ्या विदर्भाचे खंदे समर्थक होते. त्यामुळे जांबुवंतराव धोटे यांच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात ते सक्रियतेने सहभागी होते. १९६७ साली त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार गुंडेराव महाजन यांच्याविरोधात पहिली  निवडणूक नाग विदर्भ समितीकडून लढविली, परंतु ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश केला. निवडणूक जिंकेपर्यंत लढत राहिले. जनता दलाच्या तिकिटावर ते १९८४ आणि १९८९ साली विधानसभा निवडणूक जिंकले. एकवेळा त्यांना विधान परिषदेमध्येदेखील भाजपाकडून पाठविण्यात आले. खासदारकीसाठी रामटेक लोकसभा मतदार संघातूनही ते लढले. त्यामध्ये त्यांची माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, तेजसिंहराव भोसले, चित्रलेखा भोसले आणि सुबोध मोहिते यांच्याशी लढत झाली. १९९० साली त्यांनी जनता दलाला रामराम करीत बनवारीलाल पुरोहित यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. १९९१ साली भाजपच्या तिकिटावर तेजसिंहराव भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढले. यातही त्यांचा पराभव झाला. 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर