शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कोणाला तरी वाचविण्यासाठी अनिल देशमुखांचा बळी; त्यांनी माफीचा साक्षीदार व्हावे - आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 07:32 IST

राजकारणात गुन्हेगारी वाढल्याची खंत

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिमा चांगली आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांना चांगले ओळखतो. कोणाला तरी वाचविण्यासाठी त्यांचा बळी दिला जात आहे. त्यामुळे त्यांनी माफीचा साक्षीदार होऊन कायद्याला साथ द्यावी, असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अनिल देशमुख ज्या प्रकरणात फसले आहेत, त्या प्रकरणात त्यांना उगाच गोवले जात आहे. पैसे देणारे पुढे आले आहेत. विभाग म्हणतो, कलेक्शन झाले आहे. चौकशी यंत्रणेला देशमुखांकडे पैसा मिळालेला नाही; पण हे पैसे कुणाला तरी गेले आहेत. जे काही पैसे जमले आहेत ते कुणाकडे नेऊन पोहोचविले. कोणाकडे ते गेले, याचा खुलासा देशमुख यांनी करावा.

या प्रकरणात त्यांनी कायद्याला सहकार्य केल्यास, माफीचा साक्षीदार झाल्यास त्यांची सुटका होऊ शकते. या प्रकरणात मोहरे समोर येत आहेत; पण वजीर आणि राजा समोर येत नाही. पोलीस यंत्रणाही राजाला किंवा वजिराला पुढे आणत नाही. त्यामुळे राज्यपालांनी त्यावर विचार करणे गरजेचे आहे. आंबेडकर म्हणाले की, दिवाळीनंतर फटाके फुटणार म्हणून सांगण्यात येत होते. फटाके फुटायला लागले अशी परिस्थिती आहे; पण महत्त्वाचा फटाका कधी फुटतोय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

राजकारण झाले व्यावसायिक

राजकारण एकेकाळी सेवा म्हणून बघितले जात होते. आता व्यावसायिक झाले आहे. त्यातून राज्यालाच लुटले जात आहे. त्यामुळे न्यायालयाची भूमिका आता महत्त्वाची झाली आहे.  न्यायालयापुढे असलेली राजकीय भ्रष्टाचाराची प्रकरणे ताबडतोब निकाली काढावीत. त्या प्रकरणाला लटकवून ठेवू नये. राजकारणात व्यावसायिकीकरण घुसले आहे. गुन्हेगारी वाढली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर