शेतकर्‍यांचा पालेभाज्या लागवडीवर भर !

By Admin | Updated: August 11, 2014 00:54 IST2014-08-11T00:27:24+5:302014-08-11T00:54:37+5:30

विदर्भातील शेतकरी पालेभाज्या लागवडीवर भर देत आहे.

Focus on cultivation of farmers! | शेतकर्‍यांचा पालेभाज्या लागवडीवर भर !

शेतकर्‍यांचा पालेभाज्या लागवडीवर भर !

अकोला : भाजीपाल्यांचे दर वाढतच असल्याने विदर्भातील शेतकरी पालेभाज्या लागवडीवर भर देत असून, या शेतकर्‍यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून भाजीपाला लागवडीचे तंत्रज्ञान देण्यात येत आहे. सध्या पालक लागवड करण्यात येत असल्याने त्यांना लागवडीची माहिती दिली जात आहे. पालेभाज्या आहारातील खनिजे, क्षार आणि जीवनसत्त्वाचा पुरवठा करणारा नैसर्गिक स्त्रोत आहे. पालेभाज्यात अ आणि क जीवनसत्त्वासह कॅल्शियम,लोह व इतर क्षारांचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे पालेभाज्यांची मागणी मोठी असते.थोड्याशा भांडवलावर कमी जागेत झटपट आणि सतत पैसा मिळवून देणारे हे पीक आहे. उन्हाळी हंगामात पालेभाज्यांची मोठी मागणी असते आणि बाजारभाव चांगले मिळतात म्हणून अलीकडे शेतकर्‍यांनी पालेभाज्या लागवडीवर भर दिला आहे.पालक या भाजीत अ,क प्रथिने, लोह, चुना व इतर खनिजे भरपूर आहेत. त्यामुळे आहाराच्या दृष्टीने पालक महत्त्वाची भाजी आहे. पालकाची आमटी,सूप, भजी तसेच विविध भाज्या तयार करता येतात. राज्यात सर्वत्र पालकाची लावगड केली जाते. खरीप हंगामात जून,जुलै तर रब्बी हंगामात सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात लागवड करतात.या भाजीचा सतत पुरवठा करायचा असल्यास १0 ते १५ दिवसांच्या अंतराने पालकाचे बी पेरावे लागते.मेथी या पालेभाजीचे कसुरी व नेहमीची मेथी असे दोन प्रकार आहेत. आपल्याकडे या भाजीची लागवड खरीप व रब्बी हंगामात केली जाते. या भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी टप्प्या-टप्प्याने पेरणी केली जाते.कोथिंबीर प्रामुख्याने खरीप हंगामात पेरली जाते. कोथिंबीरची मागणी वर्षभर असते. फळझाडे किंवा इतर भाजीपाला पिकात कोथिंबीर आंतरपीक म्हणून घेतली जाते. त्यामुळे तिचे प्रखर उन्हापासून संरक्षण होते.आंबटचुका पालेभाजी गोल आकाराची असून, किंचित चवीला आंबट आहे. विविध औषधी गुणधर्म अर्थात वात दोष व पचनक्रिया सुधारण्यास मदत करणारी आंबटचुका भाजी हिवाळी हंगामात घेतली जाते.

Web Title: Focus on cultivation of farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.