शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

पुरामुळे नागपूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 12:33 IST

पूरस्थितीमुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यात २९२६२.११ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्देसोयाबीन कापसाला सर्वाधिक फटकाकृषी विभागाने शासनाकडे सादर केला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यात २९२६२.११ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला आहे.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपस्थितीने जिल्ह्यातील मौदा, कामठी, पारशिवनी, कुही, नरखेड, रामटेक, सावनेर या तालुक्यातील ६१ वर गावे बाधित झाली असून ४९११ कुटुंबांना फटका बसला आहे. महसूल विभागातर्फे यापूर्वीच बाधित क्षेत्रातील शेतीसह, नागरी भागातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. पूरामुळे १६०२ जनावरे मृत्यू पावलेत, ७७६५ घरांची पडझड झाली. ५० जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. पुराचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे. जिल्ह्यात यंदा खरीपाचे एकूण क्षेत्र ५ लाख १०० हेक्टर इतके नियोजित करण्यात आले होते. यापैकी २९ हजार २६२.११ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोरडवाहूतील २७८२९.८५ हेक्टर, ओलिताखालील १३५२.४७ हेक्टर व बहुवार्षिक पिकाखालील ७९.७९ हेक्टरचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक कापूस, सोयाबीन, तूर, धान या मुख्य पिकांसह भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

यंदा कोरोनानंतरही जिल्ह्यात खरीपामध्ये बंपर पेरणी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादनाची हमी होती. परंतु पुरामुळे शेतकºयांवर चांगलेच संकट कोसळले आहे. पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्राचेही पथक जिल्ह्यात येऊन गेले. जिल्हा प्रशासन व कृषी विभागानेही नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :floodपूर