शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अग्निपथच्या ज्वाळा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? २० आणि २२ जूनला गोळा होण्याचे सांकेतिक आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 08:00 IST

Nagpur News देशातील विविध प्रांतात धगधगणाऱ्या ‘अग्निपथ’च्या ज्वाळा चोहोबाजूने महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजने सुरक्षा यंत्रणा पूर्णत: अलर्ट मोडवर आली आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर मेसेज व्हायरलसुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

नरेश डोंगरे 

नागपूर - देशातील विविध प्रांतात धगधगणाऱ्या ‘अग्निपथ’च्या ज्वाळा चोहोबाजूने महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्या आहेत. यासंबंधाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजने सुरक्षा यंत्रणा पूर्णत: अलर्ट मोडवर आली असून, कसलाही धोका होऊ नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा कामी लागल्या आहेत.

सरकारने लष्कर भरतीच्या अनुषंगाने ‘अग्निपथ’ योजनेचे स्वरूप स्पष्ट केल्यापासून देशातील अनेक राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या योजनेच्या विरोधात ठिकठिकाणी हिंसक आंदोलन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, हिंसक आंदोलकांनी यूपी, बिहारमध्ये रेल्वेगाड्यांची जाळपोळ तसेच सरकारी गोदामाची तोडफोड करून मोठे नुकसान केले आहे. काही राज्यात बसेसचीही तोडफोड करण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी गोळीबारही झाला आहे. अनेक राज्यात आंदोलकांनी रेल्वेगाड्यांना टार्गेट केल्यामुळे विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.

खास करून बिहार, उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. आंदोलनाचे लोण महाराष्ट्रालगतच्या मध्य प्रदेश, तेलंगणापर्यंत पोहचले आहे. राज्यात तूर्त असे कोणतेही आंदोलन अद्याप झालेले नाही. मात्र, गेल्या काही तासापासून वेगवेगळे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. २० आणि २२ तारखेला जळगावसह काही रेल्वेस्थानकावर गोळा होण्याचे सांकेतिक आवाहन या मेसेजमधून करण्यात आल्याची माहिती आहे.

स्पष्टपणे काही लिहिले नसले तरी हे मेसेज म्हणजे ‘अग्निपथ’च्या विविध राज्यात धगधगणाऱ्या ज्वाळा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्याचे संकेत असल्याचा अर्थ काढला जात आहे. हे मेसेज रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (आरपीएफ) हाती लागले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणा एकदम अलर्ट मोडवर आल्या आहेत. त्यामुळे जागोजागच्या पोलिसांच्या मदतीने जीआरपी आणि आरपीएफने सुरक्षेच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

संयुक्त उपाययोजना

मेसेज व्हायरल झाले असले तरी अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनाचा रेल्वेच्या नागपूर मंडळाला धोका होण्याची शक्यता दिसत नाही. मात्र, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुरक्षेच्या उपाययोजना करणार आहोत, अशी माहिती या अनुषंगाने आरपीएफचे सिनियर कमांडंट आशुतोष पांडे यांनी लोकमतला दिली.

भविष्य खराब करू नका - एम. राजकुमार

आंदोलनाच्या माध्यमातून सरकारी संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल होतात. अशा तरुणांना नंतर सरकारी नोकरीची संधी मिळत नाही. त्यामुळे कुणीही हिंसक आंदोलन करू नये, असे आवाहन जीआरपीचे एसपी एम. राजकुमार यांनी केले आहे.

----

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजना