शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

अस्थमाच्या बाल रुग्णांमध्ये दरवर्षी पाच टक्क्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:13 AM

वाढते प्रदूषण, शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव लहान मुलांमध्ये दिसून येऊ लागला आहे. विशेषत: श्वसनाशी संबंधित आजार वाढले आहेत. अस्थमाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी चार ते पाच टक्क्याने वाढ होत आहे. याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत अकॅडमी ऑफ पेडियाट्रिकच्या (एओपी) पदधिकाऱ्यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देअकॅडमी ऑफ पेडियाट्रिक : श्वसन विकारावर कार्यशाळा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वाढते प्रदूषण, शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव लहान मुलांमध्ये दिसून येऊ लागला आहे. विशेषत: श्वसनाशी संबंधित आजार वाढले आहेत. अस्थमाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी चार ते पाच टक्क्याने वाढ होत आहे. याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत अकॅडमी ऑफ पेडियाट्रिकच्या (एओपी) पदधिकाऱ्यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.याप्रसंगी ‘एओपी’चे अध्यक्ष डॉ. रवी भेलोंडे, सचिव डॉ. महेश तुराळे व डॉ. शिल्पा हजारे उपस्थित होत्या.डॉ. भेलोंडे म्हणाले, दमा अर्थात अस्थमा. श्वसननलिकेला सूज आल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे फुफ्फुसाला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे प्रमाण कमी होतो. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो किंवा सतत धाप लागते. दमा हा आजार अनुवांशिकतेने अथवा वाढते प्रदूषण, दमट हवामान, ढगाळ वातावरण यामुळे त्रास होऊ शकतोग्रामीणपेक्षा शहरात धोका अधिकडॉ. तुराळे म्हणाले, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरिकांना दम्याचा धोका अधिक आहे. वाढते शहरीकरण, गाड्यांची रहदारी तसेच अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे वाढलेले धुळीचे प्रमाण यामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.बदललेली आहारपद्धती हे एक कारणडॉ. हजारे म्हणाल्या, बदललेली आहारपद्धती हे सुद्धा दमा होण्यास प्रमुख कारणे मानले जाते. पिज्झा, बर्गर, फास्ट फूड, चिप्स, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ तसेच वेगवेगळ्या पद्धतीची शीतपेये आदीचे अधिक सेवनही दमा होण्यास कारणीभूत ठरते.दरवर्षी क्षयरोगाचे सव्वा लाख रुग्णडॉ. भेलोंडे म्हणाले, दरवर्षी क्षयरोगाचे सव्वा लाख रुग्ण आढळून येतात. क्षयरोगात न्युमोनियामुळे होणाºया मृत्यूचे दुसरे कारण ठरले आहे. विशेष म्हणजे, ‘मल्टी ड्रग रेजिस्टन्स टीबी’ (एमडीआर) ७० ते ८० हजार नवे रुग्णही दरवर्षी सामोर येत आहे. यात साधारण ८ टक्के लहान मुले असतात.नागपुरात डायरियाचे ५० टक्के रुग्णसध्या नागपुरात ‘व्हायरल’चा प्रकोप सुरू असलातरी ५० टक्के रुग्ण हे ‘डायरिया’चे आहे. दूषित पाणी व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार होतो. या शिवाय, अ‍ॅलर्जी अस्थमा, डेंग्यूचे रुग्णही दिसून येऊ लागले आहेत.‘पल्मोनोलॉजी’वर कार्यशाळा‘एओपी’च्यावतीने २८ जुलै रोजी ‘आयएमए’ सभागृहात ‘पेडियाट्रिक पल्मोनोलॉजी’वर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. एस.के. काबरा, डॉ. एस. नागभूषण व डॉ. उपेंद्र किंजवाडेकर उपस्थित राहतील.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर