शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नागपुरात आणखी पाच उड्डाणपूल होणार, ७९२ कोटींच्या निधीला मंजुरी; पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरला जोडणार

By योगेश पांडे | Updated: October 29, 2023 22:30 IST

पूर्व नागपूरचे आ.कृष्णा खोपडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या पाच उड्डाणपुलांबाबत अनेक काळापासून मागणी होती.

नागपूर : उपराजधानीत आणखी पाच उड्डाणपूल तयार होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. राज्य शासनाने शहरातील पाच उड्डाणपुलांसाठी ७९२ कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून या उड्डाणपुलांच्या माध्यमातून पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरला जोडण्यात येणार आहे. यामुळे या भागांमधील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे.

पूर्व नागपूरचे आ.कृष्णा खोपडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या पाच उड्डाणपुलांबाबत अनेक काळापासून मागणी होती. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरदेखील मागणी करण्यात आली आहे. महारेलतर्फे उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रस्ताव दोन्ही नेत्यांसमोर मांडण्यात आला. १२ जून रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीदरम्यान या उड्डाणपुलांना मान्यता देण्यात आली होती. राज्य शासनाकडूनदेखील या प्रकल्पासाठी ७९२ कोटींंच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या उड्डाणपुलाच्या निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असून महारेल कंपनीचे एमडी राजेशकुमार जैस्वाल यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

या मार्गांवर होणार उड्डाणपूल

- रेशीमबाग ते के.डी.के. कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडेप्लॉट – २५१ कोटी- चंद्रशेखर आझाद चौक- गंगाजमुना ते मारवाडी चौक – ६६ कोटी- लकडगंज पो.स्टे. ते वर्धमाननगर – १३५ कोटी- नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक – ६६ कोटी- वर्धमाननगर ते निर्मलनगरी उमरेड रोड – २७४ कोटी

वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक हैराण

ज्या मार्गावर सध्या पाच उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत, तेथे सातत्याने रहदारी असते व वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक हैराण होतात. विशेषत: रेशीमबाग ते केडीके कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडेप्लॉट, चंद्रशेखर आझाद चौक, वर्धमाननगर इत्यादी भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी असते. उड्डाणपुलांचे काम सुरू झाल्यावर त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींनी आग्रह धरायला हवा, अशी नागरिकांची भावना आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार