शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

नामांतर आंदोलनात नागपुरात झालेले ते पहिले बलिदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:11 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ आॅगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील पाच भीमसैनिक पोलिसांच्या पाशवी गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासून हा दिवस प्रत्येक वर्षी नामांतर शहीद दिवस म्हणून पाळला जातो. वीर शहिदांना जयभीमची सलामी दिली जाते.

ठळक मुद्देमराठवाडा विद्यापीठ नामांतर शहीद दिन विशेष : घटनेला ४० वर्षे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ आॅगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील पाच भीमसैनिक पोलिसांच्या पाशवी गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासून हा दिवस प्रत्येक वर्षी नामांतर शहीद दिवस म्हणून पाळला जातो. वीर शहिदांना जयभीमची सलामी दिली जाते.महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव एकमताने पारित झाला. परंतु जातीयवादी लोकांना हे पटले नाही. त्यांनी याला तीव्र विरोध करीत मराठवाडा पेटविला. दलितांवर अत्याचार सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला होत असलेला विरोध व दलितांवरील अत्याचार पाहता नागपुरातील आंबेडकरी समाजमन अस्वस्थ झाले होते. याच्या संतप्त प्रतिक्रिया नागपूर शहरात उमटू लागल्या होत्या. ठिकठिकाणी आंबेडकरी युवक, कार्यकर्ते व समाजबांधव रस्त्यावर उतरले होते. ४ आॅगस्ट १९७८ रोजी नागपुरातील आंबेडकरी जनता हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. इंदोरा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चा आटोपून नागरिक समूहाने घराकडे परतत असताना पोलिसांनी या समूहास लक्ष्य केले. पोलिसांनी कामठी मार्गावरील इंदोरा १० नंबर पूल परिसरात आंबेडकरी जनतेवर गोळीबार केला. ४ व ५ आॅगस्ट असे दोन दिवस पोलिसांचा धुडगूस सुरू होता. पोलिसांच्या या गोळीबारात पाच भीमसैनिक शहीद झाले. यात अविनाश डोंगरे या बालकाचाही समावेश होता. या गोळीबारात रतन मेंढे, शब्बीर हुसेन फजल हुसेन, किशोर बाळकृष्ण काकडे, अब्दुल सत्तार, बशीर अली हे शहीद झाले. पोलिसांच्या गोळीबरात अनेक निरपराध नागरिक प्रामुख्याने तरुण जखमी झाले होते. कुणाच्या हातात, कुणाच्या पायात, जांघेत, तर कुणाच्या पोटात गोळी लागून ते जखमी झाले होते.यानंतर पुढच्या वर्षी ६ डिसेंबर रोजी १९७९ रोजी पुन्हा मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या अंमलबजावणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या वेळीही ४ आॅगस्टची पुनरावृत्ती करून पोलिसांनी गोळीबार केला. यात ज्ञानेश्वर बुधाजी साखरे, दिलीप सूर्यभान रामटेके, रोशन बोरकर, डोमाजी भिकाजी कुत्तरमारे हे चार भीमसैनिक शहीद झाले. तर कित्येक जखमी झाले. पुढे आंबेडकरी जनतेच्या आंदोलनापुढे सरकारला नमते घ्यावे लागले. १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव अस्तित्वात आले.त्या भीमसैनिकांच्या स्मृतीस उभारले शहीद मारकमराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी महाराष्ट्रात सातत्याने आंदोलन चालले. तब्बल १६ वर्षे हे आंदोलन सुरू होते. या दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात अनेक भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ४ आॅगस्ट रोजी १० नंबर पुलावर आंबेडकरी समाज प्रत्येक वर्षी एकत्र येऊन शहीद भीमसैनिकांना आदरांजली वाहत असे. पुढे महापालिकेनेही याची दखल घेत नामांतर आंदोलनातील शहीद भीमसैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहीद स्मारक उभारले. या स्मारकावर नामांतर आंदोलनातील सर्व शहीद भीमसैनिकांची नावे कोरलेली आहेत.‘‘आंबेडकरी जनतेच्या १६ वर्षाच्या अविरत संघर्षानंतर १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नामांतर अस्तित्वात आले. नामांतरासाठी झालेला अभूतपूर्व लढा व त्यात प्राणाची बाजी लावून लढलेले भीमसैनिक यांच्या त्यागामुळेच नामांतर झाले आहे. या लढ्यात सर्वस्वाचे बलिदान ज्यांनी केले त्या शहिदांना मानाचा मुजरा.’’अनिल वासनिक, नामांतर लढ्यातील प्रमुख कार्यकर्ते व लेखक

टॅग्स :agitationआंदोलनuniversityविद्यापीठ