शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

आधी मराठा आरक्षण, मगच नोकरभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:23 IST

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात ‘मेगा’ किंवा इतर कुठलीच नोकरी भरती करू नये, या मुख्य मागणीला घेऊन सकल मराठा समाज, मराठा क्रांती मूक मोर्चाने मुख्यमंत्र्यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन सादर केले. मागण्यांवर निर्णय न झाल्यास समाजाकडून होणाऱ्याउद्रेकाची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही निवेदनातून दिला.

ठळक मुद्देसकल मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिले नारे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात ‘मेगा’ किंवा इतर कुठलीच नोकरी भरती करू नये, या मुख्य मागणीला घेऊन सकल मराठा समाज, मराठा क्रांती मूक मोर्चाने मुख्यमंत्र्यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन सादर केले. मागण्यांवर निर्णय न झाल्यास समाजाकडून होणाऱ्याउद्रेकाची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही निवेदनातून दिला.सकल मराठा समाज, मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना निवेदन देणार असल्याने सकाळी १० वाजतापासून जिल्हाधिकारी परिसरात मोठ्या संख्येत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर नारे-निदर्शने केल्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी मुद्गल यांच्या कक्षात आले. परंतु ते जागेवर नसल्याने निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांना दिले. खजांजी यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन पोहचविण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.मराठा क्रांती मूक मोर्चाच्या शिष्टमंडळाने ‘लोकमत’ला सांगितले, गेली अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे. परंतु सरकार समाजाच्या मागण्यांकडे गांभिर्याने लक्ष देत नाही. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून विविध जिल्ह्यात ५७ मोर्चे काढले. मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यातील मराठा बांधवांनी मूक मोर्चा काढला, परंतु या लाखो मराठा बांधवांच्या जनभावनेचा आदर न करता सरकार केवळ घोषणा करून व आश्वासने देऊन मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे. तत्काळ आरक्षण देऊ अशा घोषणा करूनही सरकार मराठा आरक्षणाबाबतीत नकरात्मक आहे. म्हणूनच मराठा समाज प्रशासकीय सेवेतून हद्दपार करण्याच्या दृष्टीने सरकारने राज्यात मराठा आरक्षण मिळण्यापूर्वी ‘मेगा’ नोकरभरती जाहीर केली आहे. ही नोकरभरती मराठा समाजाला प्रशासकीय सेवेपासून वंचित ठेवणारी आहे. म्हणून या निर्णयाचा विरोध करीत आहोत. सरकारच्या मराठा विरोधी धोरणांमुळे समाज संतप्त आहे. कायद्यावर, लोकशाहीवर आमचा विश्वास असल्याने आम्ही पुन्हा एकदा सरकारला निवेदनाद्वारे निर्वाणीचा इशारा देत आहोत. परंतु त्यानंतरही मागण्यांबाबत तत्काळ निर्णय न झाल्यास समाजाच्या संतापाला आणि होणाऱ्या उद्रेकाला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

 

टॅग्स :marathaमराठाagitationआंदोलन