शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

आधी मराठा आरक्षण, मगच नोकरभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:23 IST

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात ‘मेगा’ किंवा इतर कुठलीच नोकरी भरती करू नये, या मुख्य मागणीला घेऊन सकल मराठा समाज, मराठा क्रांती मूक मोर्चाने मुख्यमंत्र्यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन सादर केले. मागण्यांवर निर्णय न झाल्यास समाजाकडून होणाऱ्याउद्रेकाची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही निवेदनातून दिला.

ठळक मुद्देसकल मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिले नारे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात ‘मेगा’ किंवा इतर कुठलीच नोकरी भरती करू नये, या मुख्य मागणीला घेऊन सकल मराठा समाज, मराठा क्रांती मूक मोर्चाने मुख्यमंत्र्यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन सादर केले. मागण्यांवर निर्णय न झाल्यास समाजाकडून होणाऱ्याउद्रेकाची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही निवेदनातून दिला.सकल मराठा समाज, मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना निवेदन देणार असल्याने सकाळी १० वाजतापासून जिल्हाधिकारी परिसरात मोठ्या संख्येत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर नारे-निदर्शने केल्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी मुद्गल यांच्या कक्षात आले. परंतु ते जागेवर नसल्याने निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांना दिले. खजांजी यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन पोहचविण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.मराठा क्रांती मूक मोर्चाच्या शिष्टमंडळाने ‘लोकमत’ला सांगितले, गेली अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे. परंतु सरकार समाजाच्या मागण्यांकडे गांभिर्याने लक्ष देत नाही. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून विविध जिल्ह्यात ५७ मोर्चे काढले. मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यातील मराठा बांधवांनी मूक मोर्चा काढला, परंतु या लाखो मराठा बांधवांच्या जनभावनेचा आदर न करता सरकार केवळ घोषणा करून व आश्वासने देऊन मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे. तत्काळ आरक्षण देऊ अशा घोषणा करूनही सरकार मराठा आरक्षणाबाबतीत नकरात्मक आहे. म्हणूनच मराठा समाज प्रशासकीय सेवेतून हद्दपार करण्याच्या दृष्टीने सरकारने राज्यात मराठा आरक्षण मिळण्यापूर्वी ‘मेगा’ नोकरभरती जाहीर केली आहे. ही नोकरभरती मराठा समाजाला प्रशासकीय सेवेपासून वंचित ठेवणारी आहे. म्हणून या निर्णयाचा विरोध करीत आहोत. सरकारच्या मराठा विरोधी धोरणांमुळे समाज संतप्त आहे. कायद्यावर, लोकशाहीवर आमचा विश्वास असल्याने आम्ही पुन्हा एकदा सरकारला निवेदनाद्वारे निर्वाणीचा इशारा देत आहोत. परंतु त्यानंतरही मागण्यांबाबत तत्काळ निर्णय न झाल्यास समाजाच्या संतापाला आणि होणाऱ्या उद्रेकाला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

 

टॅग्स :marathaमराठाagitationआंदोलन