शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नागपूर जिल्ह्यातील पहिले ‘ग्रामसंवाद भवन’ शीतलवाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:06 IST

वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण काम करीत केवळ नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाव उंचावलेल्या रामटेक तालुक्यातील शीतलवाडी ग्रामपंचायतने आणखी एक आगळेवेगळे पाऊल टाकले. त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायतच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ग्रामपंचायतने ‘ग्रामसंवाद भवन’ उभारत सोमवारी (दि. २५) एका शानदार समारंभात लोकार्पण केले. एवढेच काय तर डिजिटल अंगणवाडी इमारतीचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.

ठळक मुद्दे डिजिटल अंगणवाडी इमारतीचेही लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण काम करीत केवळ नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाव उंचावलेल्या रामटेक तालुक्यातील शीतलवाडी ग्रामपंचायतने आणखी एक आगळेवेगळे पाऊल टाकले. त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायतच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ग्रामपंचायतने ‘ग्रामसंवाद भवन’ उभारत सोमवारी (दि. २५) एका शानदार समारंभात लोकार्पण केले. एवढेच काय तर डिजिटल अंगणवाडी इमारतीचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.शीतलवाडी ग्रामपंचायतने आतापर्यंत अनेक उपक्रम राबविले. त्यामुळेच या ग्रामपंचायतचे सर्वदूर नाव झाले आहे. तेथील विकास कामे आणि उपक्रमांची दखल सर्वस्तरावर घेतली जात आहे. अशात ग्रामपंचायतला १४ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून समाजभवन इमारत मंजूर झाली. त्या इमारतीत मोठे सभागृह असून, तेथे ग्रामस्थांशी संवाद साधला जाणार आहे. त्यामुळेच या इमारतीला ‘ग्रामसंवाद भवन’ हे नाव देण्यात आले. त्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले; सोबतच डिजिटल अंगणवाडीचे लोकार्पण करण्यात आले. ही डिजिटल अंगणवाडीही नाविन्यपूर्ण अशी असून, इमारतीच्या प्रत्येक भिंतीवर बालकांवर संस्कार करणारी चित्रे, प्रतिकृती रेखाटण्यात आल्या आहेत. नागरी सुविधा योजनेंतर्गत ५० लाखांच्या विविध विकास कामांचेही लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला संसद आदर्श ग्राम समितीचे सदस्य तथा आदर्श ग्राम पाटोदा(जि. औरंगाबाद)चे सरपंच भास्करराव पेरे पाटील, खासदार कृपाल तुमाने, आ. डी. एम. रेड्डी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर, माजी आ. आशिष जयस्वाल, शीतलवाडीच्या सरपंच योगिता गायकवाड, उपसरपंच आशिष भोगे, जिल्हा परिषद सदस्य वर्षा धोपटे, पंचायत समिती सभापती किरण धुर्वे, सदस्य हरिसिंग सरोदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.शीतलवाडी ग्रामपंचायतने आतापर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांचे सचित्र विवरण असलेल्या ‘ग्रामविकासाची यशोगाथा’ या पुस्तकाचे कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.ग्रामपंचायत कर्मचारी जगदीश खुडसाव, धनराज पालीवाल, अविनाश चन्ने, पार्वती सूर्यवंशी, रामकृष्ण वंजारी, जितेंद्र बेले, पुरुषोत्तम मोहनकार, पौर्णिमा गेडाम, माजी कर्मचारी नितीन बंडीवार, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निमजे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मेहर, सुरेश वांदिले, गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले, एकात्मिक बालसेवा प्रकल्प अधिकारी कर्णेवार, नायब तहसीलदार नितीन धापसे, रश्मी काठीकर, शालिनी शेंडे, सरपंच भगवान गोंगले, योगेश्वरी चोखांद्रे, किरण जयस्वाल, छाया वांढरे, नंदा मस्के, ताराचंद सलामे, मीनाक्षी वागधरे, पाचगावच्या सरपंच पुण्यशीला मेश्राम, शीतलवाडीचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश भोजने, कृष्णा गेचुडे, मूलचंद यादव, विनोद सावरकर, उषा उईके, रंजना लेंडे, शैला अतकरे, निर्मला कोडवते, ग्रामविकास अधिकारी आर. डी. मोंढे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.शीतलवाडीचा आदर्श घ्या : कृपाल तुमानेशीतलवाडी ग्रामपंचायतने सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला. त्यात आलेल्या अडचणीवर मात करीत प्रामाणिक प्रयत्न केले. त्यामुळेच या ग्रामपंचायतचा जिल्ह्यात दबदबा आहे. शीतलवाडी ग्रामपंचायतप्रमाणेच इतर ग्रामपंचायतींनीही वाटचाल करावी, अशी अपेक्षा खा. कृपाल तुमाने यांनी यावेळी व्यक्त केली. आदर्श ग्राम पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांमध्ये एकजूटता असावी. एकोप्यानेच गावाचा विकास साधता येतो, असे मत व्यक्त केले. माजी खा. जयस्वाल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी विकासकामात सहकार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर