शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आधी स्थगिती, आता निधी रोखला; DPC कडून उशिरा निधी मिळाला तर अखर्चित राहणार

By गणेश हुड | Updated: December 23, 2023 16:19 IST

आर्थिक वर्ष संपायला तीन महिन्यांचा कालावधी आहे

नागपूर : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंजूर निधी महायुतीच्या सरकारने रोखला होता. त्यामुळे सात-आठ महिने विकासकामे ठप्प होती. काही महिन्यांपूर्वी स्थगिती उठवली. परंतु, त्यानंतर निधी वाटपात अन्याय करण्यात आल्याचा जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. त्यात जनसुविधा व नागरी सुविधा अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) जिल्हा परिषदेला मिळणारा निधी रोखण्यात आला आहे. एक-दोन आठवड्यात हा निधी न मिळाल्यास अखर्चित राहण्याची शक्यता आहे.

आर्थिक वर्ष संपायला तीन महिन्यांचा कालावधी आहे. तर लोकसभेची आचारसंहिता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उशिरा निधी मिळाल्यास प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रिया यात दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अशा परिस्थितीत फेब्रुवारीत आचारसंहिता लागल्यास निधी मिळाला तरी तो विकासकामांवर खर्च करणे शक्य होणार नाही.

जिल्हा नियोजन समिती(डीपीसी)कडून विविध विकासकामांसाठी १५० ते २०० कोटींचा निधी मिळतो. यात जनसुविधा व नागरी सुविधा, ३०:५४ अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळतो. यासाठी ६० कोटींची मागणी केली होती. मात्र, फक्त ५ कोटी मिळाले. यातून सदस्यांना रस्त्यांची कामे करता येणे शक्य नसल्याचे जि.प.सदस्य दुधाराम सव्वालाखे यांनी सांगितले. दुसरीकडे ५०:५४ अंतर्गत ५० कोटींचा निधी मंजूर आहे. परंतु, यात आमदारांचा वाटा अधिक आहे.

जनसुविधा व नागरी सुविधा, ३०:५४, तीर्थक्षेत्र विकासकामांचे प्रस्ताव पाठवून काही महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, अद्याप हा निधी मिळालेला नाही. परिणामी विकासकामे थांबली आहेत. शासनाने हा निधी तातडीने द्यावा.- मुक्ता कोकड्डे, जि.प. अध्यक्ष 

टॅग्स :nagpurनागपूरzpजिल्हा परिषद