नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून तीव्रतेने प्रतीक्षा लागून असलेल्या श्रावणाच्या आनंदसरी साेमवारी रात्रीपासून बरसल्या. नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात थांबून थांबून पावसाची रिमझिम चालली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवार, गुरुवारी पावसाचा जाेर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भात यवतमाळ व वाशिम वगळता सर्व जिल्ह्यात साेमवारी रात्रीपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. चंद्रपूर व गडचिराेलीत दमदार सरी बरसल्या. मंगळवार सकाळपर्यंत ३० मि.मी. व गडचिराेलीत १५ मि.मी पावसाची नाेंद झाली. याशिवाय नागपूर, अकाेला, अमरावती, वर्धा, भंडारा या जिल्ह्यात जाेरात नाही पण रात्री रिपरिप सुरू हाेती. नागपूरला मंगळवार सायंकाळपर्यंत १३ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. अकाेल्यातही २४ तासात १९.१ मि.मी. पाऊस झाला आहे. वर्ध्यातही संथपणे रिमझिम चालली आहे.
२ जूनला नवतपा संपल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढत गेली हाेती. मान्सून २८ मे राेजी विदर्भाच्या काठावर पाेहचला खरा पण त्यानंतर पुढे सरकलाच नाही. ढगाळ वातावरण हाेते पण सूर्याचा तापही अधिक हाेता. यामुळे तयार झालेल्या दमट वातावरणाने उकाड्याची तीव्रता आणखी वाढवली. या काळात बहुतेक दिवस तापमान ४० अंशाच्या वरच राहिले. २० जून राेजी नागपूरचे कमाल तापमान ४४ अंशापर्यंत गेले, जे मे महिन्यातही कधी गेले नव्हते. अकाेला, अमरावती तर तापलेच हाेते.
यादरम्यान २० जूनपर्यंत विदर्भात मान्सून पसरल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. गडचिराली व चंद्रपूर जिल्ह्यात चांगला पाऊसही झाला. मात्र इतर जिल्हे काेरडेच हाेते. हवामान विभागाने २४ जूनपासून जाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. जाेरदार नसल्याने हळुवार पडलेल्या श्रावणसरी नागरिकांना आणि शेतकऱ्यांनाही दिलासा देणाऱ्या ठरल्या. कारण पेरणीसाठी आणि पेरलेले वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे डाेळे आकाशाकडे लागले हाेते. दिवसा उकाडा थाेडा जाणवत असला तरी त्यात माेठ्या प्रमाणात कमतरता आली आहे. तापमानातही सरासरीपेक्षा माेठी घट झाली आहे.