शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अखेर शालार्थ घोटाळ्यातील ‘वॉन्टेंड’ नीलेश वाघमारेला अटक

By योगेश पांडे | Updated: August 14, 2025 20:29 IST

चौकशीतून समोर येतील अनेक ‘लिंक्स’ : चार महिन्यांपासून होता फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यातील महत्त्वाची ‘लिंक’ असलेला वेतन विभाग अधीक्षक नीलेश बाबुराव वाघमारे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्याच्या चौकशीतून अनेक मोठ्या लिंक्स समोर येण्याची शक्यता आहे. वाघमारे हा चार महिन्यांपासून फरार होता व त्याचा अगदी गोव्यातदेखील जाऊन एसआयटी तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने शोध घेतला होता. ‘लोकमत’ने वारंवार नीलेश वाघमारे फरार असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

राज्यभर गाजत असलेला कोट्यवधींच्या शालार्थ आयडी घोटाळा व अपात्र मुख्याध्यापक नियुक्ती घोटाळ्यात आतापर्यंत २४ हून अधिक जणांना अटक झाली आहे. यातून पोलिसांच्या हातात रोज नवीन माहिती येत आहे. नीलेश वाघमारे हा या घोटाळ्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. नीलेश वाघमारे याचा एसआयटीच्या पथकाने नागपुरात अनेक ठिकाणी शोध घेतला. गोवा येथे त्याची गुंतवणूक असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी तीन वेळा गोवा येथे जाऊन संभाव्य ठिकाणी त्याचा शोध घेतला होता. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. त्याला लपण्यास मदत करणाऱ्यांवरदेखील कारवाईचा इशारा देण्यात आला होता. उपसंचालक दर्जाचे अधिकारी एसआयटीच्या जाळ्यात अडकले असताना, वाघमारे त्यांच्या हाती लागू नये, ही बाब अनेक प्रश्न उपस्थित करणारी होती.

‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर सायबर पोलीस व एसआयटीकडून परत एकदा वाघमारेचा वेगाने शोध सुरू झाला होता. तो काही दिवसांपासून नागपुरात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. तांत्रिक तपासाच्या आधारे तो धरमपेठमध्ये लपला असल्याचे स्पष्ट झाले. त्याला गुरुवारी सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने तेथून उचलले. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

वाघमारेची चौकशीत उडवाउडवीची उत्तरेपहिल्याच दिवशी पोलिसांनी वाघमारेची कसून चौकशी केली. मात्र चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या दाव्यांत फोलपणा असल्याचे स्पष्ट झाले. या संपूर्ण घोटाळ्यात वाघमारे याची चौकशी होणे अतिशय महत्त्वाची बाब आहे.

का महत्त्वाचा आहे नीलेश वाघमारे ?वासुदेव नगर येथील रहिवासी असलेला वाघमारे हा २०१९ ते ९ एप्रिल २०२५ या कालावधीत वेतन पथक अधीक्षक (प्राथमिक) म्हणूून कार्यरत होता. जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. आतापर्यंत ६९० शिक्षकांची नावे समोर आली आहे. त्यांच्या वेतनापोटी शासनाचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. या शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याची माहिती असूनदेखील वाघमारेने वेतन काढले होते. प्रकरणात नीलेश वाघमारेला निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणात पहिल्यांदा अटक करण्यात आलेल्या उपसंचालक उल्हास नरड यांची तक्रार आणि अहवालाच्या आधारावर वाघमारेचे निलंबन झाले होते.

टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षण