शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

राज्यातील आकडेवारी : स्वाईन फ्लूमुळे १९९ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:38 IST

राज्यात डेंग्यू सोबतच आता स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे म्हणणे आहे. विदर्भातही बळीची संख्या १५ असून रुग्णांची संख्या ८० झाली आहे. नागपूर शहरात आतापर्यंत २२ रुग्ण व दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्दी, ताप, घसादुखीचा आजार अंगावर काढू नये, औषधोपचारानंतर २४ तासांत बरे वाटले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘टॅमिफ्लूच्या’ गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

ठळक मुद्देनागपुरातही २२ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात डेंग्यू सोबतच आता स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे म्हणणे आहे. विदर्भातही बळीची संख्या १५ असून रुग्णांची संख्या ८० झाली आहे. नागपूर शहरात आतापर्यंत २२ रुग्ण व दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्दी, ताप, घसादुखीचा आजार अंगावर काढू नये, औषधोपचारानंतर २४ तासांत बरे वाटले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘टॅमिफ्लूच्या’ गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.हवामानातील बदल स्वाईन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. नुकतेच व्हेंटिलेटर असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर करावयाच्या उपचारांमध्ये एकसूत्रीपणा यावा यासाठी औषधोपचारांचा ‘प्रोटोकॉल’ करण्याबाबत चर्चा झाली. यात राज्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू संशयित १६ हजार रुग्ण दाखल झाल्याचे सामोर आले आहे. स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या ‘डेथ आॅडिट’ अहवालात औषधोपचारास विलंब हे एक प्रमुख कारणही आढळून येत आहे. मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. सोबतच हवेच्या माध्यमातून आणि संसर्गातून या विषाणूंचा फैलाव होतो, अशा वेळी शिंकताना आणि खोकताना नाक, तोंडावर रुमाल धरावा, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.स्क्रब टायफसने घेतला महिलेचा बळीस्वाईन फ्लसोबतच स्क्रब टायफसच्याही रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. नागपूरच्या एकट्या मेडिकलमध्ये या आजाराच्या १४५ रुग्णांची नोंद झाली आहे, तर २२ रुग्णांचे बळी गेले आहेत. बुधवारी यवतमाळ येथील पूजा सावंत (४५) या महिलेचा मेडिकलमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला.

नागपूर विभागात दुर्लक्षचनागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या सहा जिल्ह्यामध्ये स्क्रब टायफस, डेंग्यू व आता स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहे. परंतु या आजाराची जबाबदारी असलेल्या आरोग्य विभागाचे (हिवताप) सहायक संचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचीही जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय, जिल्हा हिवताप अधिकारी दीर्घ रजेवर गेल्या आहेत. यामुळे या विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. बळीची संख्या वाढल्यावरच याला गंभीरतेने घेणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू