शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

राज्यातील आकडेवारी : स्वाईन फ्लूमुळे १९९ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:38 IST

राज्यात डेंग्यू सोबतच आता स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे म्हणणे आहे. विदर्भातही बळीची संख्या १५ असून रुग्णांची संख्या ८० झाली आहे. नागपूर शहरात आतापर्यंत २२ रुग्ण व दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्दी, ताप, घसादुखीचा आजार अंगावर काढू नये, औषधोपचारानंतर २४ तासांत बरे वाटले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘टॅमिफ्लूच्या’ गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

ठळक मुद्देनागपुरातही २२ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात डेंग्यू सोबतच आता स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे म्हणणे आहे. विदर्भातही बळीची संख्या १५ असून रुग्णांची संख्या ८० झाली आहे. नागपूर शहरात आतापर्यंत २२ रुग्ण व दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्दी, ताप, घसादुखीचा आजार अंगावर काढू नये, औषधोपचारानंतर २४ तासांत बरे वाटले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘टॅमिफ्लूच्या’ गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.हवामानातील बदल स्वाईन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. नुकतेच व्हेंटिलेटर असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर करावयाच्या उपचारांमध्ये एकसूत्रीपणा यावा यासाठी औषधोपचारांचा ‘प्रोटोकॉल’ करण्याबाबत चर्चा झाली. यात राज्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू संशयित १६ हजार रुग्ण दाखल झाल्याचे सामोर आले आहे. स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या ‘डेथ आॅडिट’ अहवालात औषधोपचारास विलंब हे एक प्रमुख कारणही आढळून येत आहे. मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. सोबतच हवेच्या माध्यमातून आणि संसर्गातून या विषाणूंचा फैलाव होतो, अशा वेळी शिंकताना आणि खोकताना नाक, तोंडावर रुमाल धरावा, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.स्क्रब टायफसने घेतला महिलेचा बळीस्वाईन फ्लसोबतच स्क्रब टायफसच्याही रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. नागपूरच्या एकट्या मेडिकलमध्ये या आजाराच्या १४५ रुग्णांची नोंद झाली आहे, तर २२ रुग्णांचे बळी गेले आहेत. बुधवारी यवतमाळ येथील पूजा सावंत (४५) या महिलेचा मेडिकलमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला.

नागपूर विभागात दुर्लक्षचनागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या सहा जिल्ह्यामध्ये स्क्रब टायफस, डेंग्यू व आता स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहे. परंतु या आजाराची जबाबदारी असलेल्या आरोग्य विभागाचे (हिवताप) सहायक संचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचीही जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय, जिल्हा हिवताप अधिकारी दीर्घ रजेवर गेल्या आहेत. यामुळे या विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. बळीची संख्या वाढल्यावरच याला गंभीरतेने घेणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू