शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

राज्यातील आकडेवारी : स्वाईन फ्लूमुळे १९९ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:38 IST

राज्यात डेंग्यू सोबतच आता स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे म्हणणे आहे. विदर्भातही बळीची संख्या १५ असून रुग्णांची संख्या ८० झाली आहे. नागपूर शहरात आतापर्यंत २२ रुग्ण व दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्दी, ताप, घसादुखीचा आजार अंगावर काढू नये, औषधोपचारानंतर २४ तासांत बरे वाटले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘टॅमिफ्लूच्या’ गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

ठळक मुद्देनागपुरातही २२ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात डेंग्यू सोबतच आता स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे म्हणणे आहे. विदर्भातही बळीची संख्या १५ असून रुग्णांची संख्या ८० झाली आहे. नागपूर शहरात आतापर्यंत २२ रुग्ण व दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्दी, ताप, घसादुखीचा आजार अंगावर काढू नये, औषधोपचारानंतर २४ तासांत बरे वाटले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘टॅमिफ्लूच्या’ गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.हवामानातील बदल स्वाईन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. नुकतेच व्हेंटिलेटर असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर करावयाच्या उपचारांमध्ये एकसूत्रीपणा यावा यासाठी औषधोपचारांचा ‘प्रोटोकॉल’ करण्याबाबत चर्चा झाली. यात राज्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू संशयित १६ हजार रुग्ण दाखल झाल्याचे सामोर आले आहे. स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या ‘डेथ आॅडिट’ अहवालात औषधोपचारास विलंब हे एक प्रमुख कारणही आढळून येत आहे. मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. सोबतच हवेच्या माध्यमातून आणि संसर्गातून या विषाणूंचा फैलाव होतो, अशा वेळी शिंकताना आणि खोकताना नाक, तोंडावर रुमाल धरावा, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.स्क्रब टायफसने घेतला महिलेचा बळीस्वाईन फ्लसोबतच स्क्रब टायफसच्याही रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. नागपूरच्या एकट्या मेडिकलमध्ये या आजाराच्या १४५ रुग्णांची नोंद झाली आहे, तर २२ रुग्णांचे बळी गेले आहेत. बुधवारी यवतमाळ येथील पूजा सावंत (४५) या महिलेचा मेडिकलमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला.

नागपूर विभागात दुर्लक्षचनागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या सहा जिल्ह्यामध्ये स्क्रब टायफस, डेंग्यू व आता स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहे. परंतु या आजाराची जबाबदारी असलेल्या आरोग्य विभागाचे (हिवताप) सहायक संचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचीही जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय, जिल्हा हिवताप अधिकारी दीर्घ रजेवर गेल्या आहेत. यामुळे या विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. बळीची संख्या वाढल्यावरच याला गंभीरतेने घेणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू