शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

जिल्हा परिषदेत कोंबड्यावरून सत्ताधारी-विरोधकांत झुंज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2022 10:29 IST

गरजूंना या योजनेचा लाभ न देता पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील, गावातील श्रीमंत लोकांना लाभ देण्यासाठी ऑफलाईनचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

ठळक मुद्देऑफलाईन योजना राबवून कोंबड्या पळवण्याचा प्रयत्न

नागपूर : शेळीवाटप योजनेत गैरप्रकार झाल्याचा मुद्दा गाजत असतानाच जिल्हा परिषेदत आता तलंग (कोंबडी) वाटप योजनाही त्याच धर्तीवर राबवून सत्ताधाऱ्यांचा कोंबड्या पळविण्याचा प्रयत्न असल्याने सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच जुंपली आहे.

गोरगरीब लोकांच्या कोंबड्या पळविण्याचा हा प्रकार आहे. गरजूंना या योजनेचा लाभ न देता पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील, गावातील श्रीमंत लोकांना लाभ देण्यासाठी ऑफलाईनचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनुदानावर शेळी, कोंबड्या वाटप योजना राबविली जाते. यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यात पदाधिकाऱ्यांना फारसा हस्तक्षेप करता येत नाही; त्यामुळे तलंग वाटप प्रक्रिया ऑफलाईन राबविण्यात यावी, अशा अशयाचा प्रस्ताव अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केला. विरोधकांनी यावर आक्षेप घेत ऑनलाईन प्रक्रियाच कायम ठेवण्याची मागणी केली. गतवर्षी ऑफलाईन पद्धतीने या योजनेची अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये गरजूऐवजी सधन लाभार्थ्यांना या गटाचे वाटप करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आतीश उमरे यांनी केला.

ऑफलाईनमध्ये सभापती, सदस्यांना अधिकार नाही

ऑफलाईन अर्ज प्रक्रियेदरम्यानही यात विभागाचे सभापती व सदस्यांना कुठलेही अधिकार देण्यात आले नव्हते. उलट एका खासगी व्यक्तीच्या माध्यमातून हे अर्ज अंतिम करण्यात येत होते. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनेच या योजनेची प्रक्रिया राबवून गावागावांत दवंडी पिटवून नागरिकांना अर्ज करण्यासाठी सूचना करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

गरिबांच्या शेळ्या धनदांडग्यांच्या घरात

दारिद्र्यरेषेखालील शेतकरी व गरजूंना पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अनुदानावर शेळी वाटप योजना राबविण्यात आली. यासाठी ऑनलाईन अर्ज विचारात न घेता ऑफलाईन अर्ज विचारात घेण्यात आले. सभापती व सदस्यांना विश्वासात न घेता १४०० लाभार्थ्यांना शेळी वाटप करण्यात आले. यात अनेक धनदांडग्यांचा समावेश असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

गायी, शेळ्या मृत पावल्या

शासनाच्या आदेशानुसार लाभार्थ्यांना पशुधन मर्जीनुसार खरेदी करता येते; परंतु जिल्हा परिषदेने कंत्राट काढून मोजक्याच विक्रेत्यांकडून त्या खरेदी करण्यासाठी बाध्य केले. यातील काही गायी, शेळ्या निकृष्ट असल्याने त्या मृत पावल्या. लाभार्थी शेतकऱ्यांना ही योजना फायद्याची ठरली नाही.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर