शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शेवटच्या दिवशी नवतपाचा ताप, पारा ४३ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 10:59 IST

पुन्हा दाेन दिवस उष्ण लाटांचा इशारा

नागपूर : नवतपाच्या पहिल्या पाच दिवसांत अवकाळी पावसाने सूर्याचा ताप राेखून धरला. दोन दिवस तर पारा ४० अंशांच्याही खाली गेला हाेता. मात्र, शेवटच्या दाेन दिवसांत नवतपाने चांगलाच ताप दिला असून, शुक्रवारी पारा ४३ अंशांवर पाेहोचला. एवढेच नाही, तर रविवार, ४ जून रोजी पारा ४५ अंशांच्या आसपास पोहोचण्याच्या भीतीसह उष्ण लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

तापमान वाढल्याने नागपूरकरांना उन्हाच्या चटक्यांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, नागपुरातील आर्द्रता संध्याकाळी केवळ १९ टक्के, तर सकाळी २९ टक्के नोंद झाली होती. जून महिन्यात नागपूरकरांना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मान्सूनच्या आगमनाची तारीख १६ जून जाहीर केली असली, तरी यंदा विदर्भात मान्सून जूनच्या शेवटच्या आठवड्यात दाखल होऊ शकतो. सध्या नैर्ऋत्य मान्सून पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि दक्षिण अरबी समुद्राकडे थोडा पुढे सरकला आहे. याशिवाय पंजाब, राजस्थान, ओडिशापर्यंत चक्रीवादळ तयार झाले आहे. सध्या मध्य भारताभोवती कोणतेही चक्रीवादळ किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले नाही. या कारणास्तव जून महिना खूप गरम असण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अमरावती येथे ४३.६ अंश तापमान होते. याशिवाय गोंदियामध्ये ४३.५, अकोला आणि वर्धा येथे ४३.४, चंद्रपूरमध्ये ४३.२, बुलढाण्यात ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

टॅग्स :weatherहवामानenvironmentपर्यावरणTemperatureतापमान