शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

देशभरात १ लाखावर शाळा बंद होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 21:49 IST

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० हे देशातील देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे नसून भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या मूल्यांशी विसंगत आहे. तसेच ते खासगीकरण, बाजारीकरणाला प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे प्रस्तावित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे नवीन शिक्षा धोरणाचा पुनर्विचार करण्याची शिक्षक संघटनांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० हे देशातील देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे नसून भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या मूल्यांशी विसंगत आहे. तसेच ते खासगीकरण, बाजारीकरणाला प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे प्रस्तावित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.नवीन शैक्षणिक धोरण हे सर्वसामान्य व गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर लोटणारे आहे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे असले तरी आजही देशात केवळ २० टक्के पालकच असे आहेत जे आपल्या पाल्यांना ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. परंतु नव्या शैक्षणिक धोरणात डिजिटल शिक्षणाचा अनाकलनीय आग्रह धरण्यात आला आहे. पयार्याने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराला फाटा देत बालकांच्या मोफत शिक्षणाची जबाबदारी शासन जाणीवपूर्वक नाकारत असून त्यामुळे गोरगरिबांची मुले दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. एकीकडे आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडली जात असताना शिक्षणासारख्या मूलभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्याची विदेशी विद्यापीठांना खुली सूट देणे ही बाब दुर्दैवी आहे. केंद्र्र शासनाच्या या भूमिकेमुळेच कमी पटसंख्येच्या नावावर देशातील १ लाख १९ हजार शाळा बंद होणार आहेत. त्यामुळे देशातील शोषित, वंचित, शेतकरी-शेतमजूर, गोरगरीब यांच्या हिताचा सर्वंकष विचार करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करून त्यामध्ये सुधारणा करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांच्या शिष्ट्यमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात केले.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण