शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

प्रतिकूल काळातील ज्येष्ठांचा त्याग अनुकूल काळात विसरू नये :  नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:51 IST

आपल्या ज्येष्ठांनी प्रतिकूल काळामध्ये परिस्थितीच्या बदलासाठी जो त्याग केला आणि परिश्रम घेतले, त्याचा विसर अनुकूल काळात आम्हाला पडता कामा नये. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेली मेहनत अपार होती. कुमार शास्त्री यांच्या लेखणीने घेतलेली नोंद येत्या काळात याचे विस्मरण होऊ देणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देविवस्वानच्या प्रकाशन समारंभात आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या ज्येष्ठांनी प्रतिकूल काळामध्ये परिस्थितीच्या बदलासाठी जो त्याग केला आणि परिश्रम घेतले, त्याचा विसर अनुकूल काळात आम्हाला पडता कामा नये. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेली मेहनत अपार होती. कुमार शास्त्री यांच्या लेखणीने घेतलेली नोंद येत्या काळात याचे विस्मरण होऊ देणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.विवस्वान प्रकाशन संस्थेच्यावतीने शनिवारी अरुणकुमार शास्त्री लिखित भारतरत्न अटलजी (लेखांजली), शतजन्म शोधिता (मुलाखती) आणि प्रसादपुष्प (व्यक्तिीरेखा) या तीन पुस्तकांचे प्रकाशन पार पडले. त्या प्रसंगी ते बोलत होते. समारंभाला प्रमुख पाहुणे गिरीश गांधी होते. भाष्यकार म्हणून ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणशास्त्री जोशी, श्रीपाद अपराजित आणि आशुतोष अडोणी आणि लेखक कुमार शास्त्री व्यासपीठावर उपस्थित होते.कुमार शास्त्री यांच्या लेखनाच्या व्यासंगाचा आणि भारतरत्न अटलजी या पुस्तकाचा उल्लेख करून नितीन गडकरी म्हणाले, वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व मोठे होते. सर्वच पक्षातील लोकांशी त्यांचे संबंध असले तरी त्यांची विचारधारा मात्र नेहमीच स्पष्ट राहिली. पक्षबांधणीच्या काळातील प्रतिकूल परिस्थितीत घेतलेले परिश्रम विसरून चालणार नाही.गडकरी आपल्या भाषणात भूतकाळात रमले. अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. पक्षाच्या दृष्टीने तो काळ उपहासाचा होता. आपले उमेदवार निवडून येणार नाही हे माहीत असतानाही अनेक ठिकाणी आम्ही जिद्दीने भाषणे ठोकायचो. छोटूभय्या हे आपणास गुरुस्थानी होते. महाविद्यालयीन जीवनापासूनच कुमार शास्त्री यांच्यात उपजत गुण होते. ते पत्रकार आणि लेखकाच्या रूपाने प्रगटले.प्रसादपुष्प या पुस्तकावर भाष्य करताना आशुतोष अडोणी म्हणाले, लेखकाने या पुस्तकाच्या निमित्ताने वाचकांना लखलखीत साद घातली आहे. महापुरुषांच्या आयुष्यातील मूल्यबोध हे या पुस्तकातील समान सूत्र आहे. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामभाऊ शेवाळकर, कवी ग्रेस, दीनदयाल उपाध्याय, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस यांच्यासारख्या अनेक महापुरुषांच्या जीवनाचे वेगळे पैलू लेखकाने मांडत वाचकांच्या मनाला घातलेली साद म्हणजे तपोपूत जीवनाची तीर्थोदके आहेत.डॉ. कुमार शास्त्री म्हणाले, ही तीन पुस्तके म्हणजे त्रिदल आहे. पुस्तकरूपाने बांधलेली ही त्रिगुणाकार विचारांची पूजा पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी, हा आपला हेतू आहे. मुलाखत ही नवनिर्मिती असते. सृजनाच्या निर्मितीसाठी तळाशी जावे लागते, हे सांगत त्यांनी आपल्या तिन्ही पुस्तकांबद्दल माहिती दिली.गिरीश गांधी म्हणाले, लेखकाच्या गुणाची निष्पत्ती लेखनातून प्रगटत असते. विचारांचा समतोल ढळू न देता डॉ. कुमार शास्त्री यांनी केलेले लेखन सर्वव्यापी ठरावे, असेच आहे. याप्रसंगी लक्ष्मणराव जोशी यांनी भारतरत्न अटलजी या पुस्तकावर तर श्रीपाद अपराजित यांनी शतजन्म शोधिता या पुस्तकांवर भाष्य केले. कार्यक्रमादरम्यान प्रकाशन संस्थेचे अजय धाक्रस यांचा सत्कार करण्यात आला. संचालन रेणुका यांनी केले. पसायदानाने सांगता झाली. शहरातील गणमान्य नागरिक समारंभाला उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी