शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कीटकनाशक फवारणी ठरतेय जीवघेणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 06:51 IST

शेतांमध्ये फवारणीची कामे सुरू आहेत. विदर्भात मात्र, कापूस व सोयाबीनवरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली कीटनाकशकांची फवारणी शेतकरी व शेतमजुरांनाच जीवघेणी ठरत आहे.

- सुमेध वाघमारे नागपूर : शेतांमध्ये फवारणीची कामे सुरू आहेत. विदर्भात मात्र, कापूस व सोयाबीनवरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली कीटनाकशकांची फवारणी शेतकरी व शेतमजुरांनाच जीवघेणी ठरत आहे. विदर्भात फवारणीमुळे आतापर्यंत ३१६ जणांना विषबाधा झाली आहे. त्यापैकी १0 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, शनिवारीही एक जण मरण पावला आहे. ही माहिती नागपूर मंडळाच्या आरोग्यसेवा उपसंचालकांनीच दिली. फवारणीमुळे विषबाधा झालेले सर्वाधिक रुग्ण व मृत्यू गोंदिया जिल्ह्यातील असल्याचे दिसून आले आहे.या वर्षी चांगला पाऊस, चांगली पिके आली. मात्र, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने कीटकनाशक सुरू केलेली फवारणी शेतकरी व शेतमजुरांच्या जिवावर उठली आहे. गेल्या वर्षी यवतमाळ, अकोला, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, धुळे, नंदूरबार, जळगाव, नांदेड, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांतील सुमारे ३४ शेतकरी व २९ शेतमजूर फवारणीमुळे विषबाधेने मरण पावले होते. त्यानंतर, विषबाधा टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले.कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी प्रतिबंधात्मक किट म्हणजेच हातमोजे, चश्मा, मास्क, टोपी, अ‍ॅप्रॉन, बूट आदींचा वापर कटाक्षाने करण्याच्या सूचना दिल्या. फवारणी करणाऱ्या शेतमजुरांना किट पुरविण्याचे व विषबाधा झाल्यास प्रथमोपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. तरीही यंदा विषबाधेचे रुग्ण वाढत आहेत.गेल्या वर्षी २२ मृत्यू, ९०० बाधितयवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीही कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन २२ शेतकºयांचा मृत्यू झाला होता, तसेच ९०० पेक्षा अधिक शेतकी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याने, यवतमाळच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.>सात जणांवर उपचार सुरूभंडारा जिल्ह्यातील आठ, गोंदियातील १२३, गडचिरोलीतील दोन, चंद्रपूर जिल्ह्यातील पाच व वर्धा जिल्ह्यातील ३३ असे मिळून १७१ रुग्ण आहेत. यातील १५८ रुग्णांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले. सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यवतमाळमध्ये तीन महिन्यांत १०५ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाल्याची नोंद सरकारी दप्तरी आहे.>दोघे अत्यवस्थनागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात विषबाधा झालेले दोन रुग्ण अत्यवस्थ असून, एक जण व्हेंटिलेटरवर आहे. दोन्ही रुग्ण मध्य प्रदेशातील आहेत.