शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दिवसा चटके, रात्री कडाका! कडाक्याच्या थंडीसाठी आणखी चार दिवस प्रतीक्षाच

By निशांत वानखेडे | Updated: November 11, 2023 18:15 IST

काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आणखी दोन दिवस राहणार

नागपूरदोन दिवस आकाशात दाटलेले ढग शनिवारी बऱ्यापैकी निवळले आणि आकाश निरभ्र झाले. त्यामुळे उन्हाचा त्रास अधिक जाणवला. दिवस आणि रात्रीचा पारा सरासरीच्या वर असून, हवी तशी थंडी अद्याप पडलेली नाही. तज्ज्ञांच्या मते, कडाक्याच्या थंडीसाठी आणखी चार-पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल.

शनिवारी नागपुरात दिवसाचे कमाल तापमान ३३ अंश नोंदविण्यात आले, जे सरासरीच्या १.१ अंश अधिक आहे. दुसरीकडे रात्रीचा पारासुद्धा सरासरीच्या ०.९ अंश अधिक असून, १७.८ अंशावर गेला आहे. विदर्भात चंद्रपूर ३१.४ अंश वगळता सर्वच शहरात कमाल तापमान ३३ अंशाच्या वर आहे. अकोल्यात सर्वाधिक ३५.४ अंशावर पारा गेला आहे. त्यामुळे चटके वाढले असून, उष्णता जाणवते आहे. चंद्रपूर वगळता रात्रीचा पारासुद्धा सर्व शहरात सरासरीच्या १ अंश वरच आहे. त्यामुळे अद्यापतरी थंडीचा प्रभाव अधिक नाही.

ढगांची गर्दी हटल्याने आता वातावरण अधिक स्वच्छ होऊन पहाटेचा गारवा वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र थंडीचा जोर नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातच वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आणखी दोन दिवस राहणार आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून कमी दाब क्षेत्राच्या निर्मितीची शक्यता असली तरी महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात मात्र कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता जाणवत नाही. अंदाजानुसार १६ नाेव्हेंबरला दिवस-रात्रीच्या तापमानात घसरण हाेऊन १७ नाेव्हेंबरपासून थंडीची चाहूल लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणnagpurनागपूर