शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शेतकऱ्यांचा पाण्यासाठी ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:23 IST

पावसाने दीर्घ काळ दडी मारल्याने पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील धानाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी तात्काळ सोडावे, या मागणीसाठी शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात कन्हान नजीकच्या नागपूर-जबलपूर महामार्गावरील डुमरी परिसरात शुक्रवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

ठळक मुद्देपेंच प्रकल्पाचे पाणी सोडा : नागपूर - जबलपूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाने दीर्घ काळ दडी मारल्याने पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील धानाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी तात्काळ सोडावे, या मागणीसाठी शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात कन्हान नजीकच्या नागपूर-जबलपूर महामार्गावरील डुमरी परिसरात शुक्रवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.पावसाने दडी मारल्याने पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील धानाचे पीक सुकायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, याच पिकावर शेतकऱ्यांची खरी भिस्त आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन पेंच प्रकल्पाचे पाणी कालव्यात ओलितासाठी सोडत नसल्याने तसेच प्रशासन पर्यायी व्यवस्था करायला तयार नसल्याने या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता नागपूर-जबलपूर महामार्गावरील डुमरी शिवारातील अण्णा मोड येथे शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीच्या बॅनरखाली ‘रास्ता रोको’ करायला सुरुवात केली. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केले.हे आंदोलन दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. यावेळी राजेंद्र मुळक यांच्यासह अन्य नेत्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांवर सडकून टीका केली.१२ आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखलया रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणाऱ्या १२ आंदोलकांविरुद्ध कन्हान पोलिसांनी भादंवि ३४१, १४३, १४९, मुंबई पोलीस कायदा १३५ अन्वये गुन्हे दाखल केले. त्यात जीवन मंगळे, रमेश कारेमोरे, घनश्याम निंबोने, सूर्यभान टोंतफु, प्रकाश सुखदेव, श्रीनिवास सुब्बाराव, भाऊराव कोकाटे, मुकेश यादव, सूरजलाल जमकुरे, अमोज वानखेडे, श्रीकांत बावनकुळे, सायबा बरबटे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन